All the contents on this blog are Copyright Protected.

All the contents on this blog are Copyright Protected.

MyFreeCopyright.com Registered & Protected
Protected by Copyscape Duplicate Content Software

Saturday 26 December 2015

दुष्काळ… (भाग २)

                   निल्याला सकाळी जाग आली ती पक्ष्यांच्या आवाजाने. खूप जणांचा घरोबा होता त्या झाडावर. पक्षी सकाळीच उडून जायचे दाण्या-पाण्यासाठी. त्यांना सुद्धा लांब जावे लागे. नाहीतर या गावात तसं काहीच नव्हतं खाण्यासाठी. निल्या जागा झाला, आज शहरात जायचे होते ना…. म्हणून त्याने जरा लगबग केली. घरी आला. आत हळूच डोकावून पाहिलं त्याने. सगळी मंडळी शांत झोपली होती. शहरात जायचं तर आंघोळ करावी लागेल म्हणून त्याने कालच जरा जास्तीच पाणी भरून ठेवलं होतं. तेच वापरणार होता तो. पण येश्या जागा झाला का ते बघायला गेला. येश्या नुकताच जागा झाला होता आणि मशेरी लावत बसला होता दाताला. 

                "येश्या…. तयारी झाली ना… निघूया ना… " येश्याने मान हलवून 'हो' म्हटलं. तसा निल्या आंघोळीसाठी घरी आला. थोडयावेळाने तयारी केली त्याने आणि आईला आवाज दिला. "ये आये… ".  आवाजाने म्हातारी जागी झाली." ये आये…. मी जाऊन येतू गं… बाळाकडं… ", तशी ती लगेच बाहेर आली. "हा… रं … बघ….जमलं तर घेऊन ये इत बाळाला… लय बरिस झालं… तोंड बी दावल नाय त्यान… " डोळ्यात पाणी आलं म्हातारीच्या. निल्याला पण वाईट वाटलं. " येतो गं… जा नीज तू… "म्हणत निल्या निघाला. येश्याची जना भाकरी बांधून देत होती. " भावोजी… तुमाला बी दिली हाय भाकर… पोटभर खा… " येश्याने डब्बा घेतला आणि दोघे निघाले संगतीने. जाता जाता जरा लांबच्या रस्त्यानेच गेले. निल्याने एक नजर फिरवली शेतावर. तसं काही नव्हतं शेतात बघायला. तरीसुद्धा बघून निल्या निघाला पुढे. शहरात जाण्यासाठी तालुक्यात जाऊन गाडी पकडावी लागे. दोघे तिथेच निघाले होते. 

              वाटेत काही रिकामी घरे होती. उजाड मोकळी शेतं होती. त्याकडे बघत बघत दोघे चालले होते. इकडच्या बऱ्याचश्या जमिनी,घरं सरपंचाकडे गहाण ठेवलेली. त्यानंतर त्याच्या बायकोने ती स्वतः काढून घेतली लोकांकडून. पैसे नाहीतर जमीन,सरळ हिशोब. काही जमिनी पडीक होत्या अश्याच. त्या जमिनीचा मालकच नाही राहिला तर कोण बघणार त्या जमिनीकडे. निल्या सुद्धा खूप वर्षांनी गावाच्या बाहेर पडत होता. गावाच्या वेशीपर्यंत आले दोघे. " किधर जा रहे हो बेटा … ? " मागून आवाज आला तसे दोघे थांबले. 

             येडा चाचा… त्याने आवाज दिला होता. गावाच्या वेशीवर घर होतं त्याचं. पण गावात राहायचा नाही कधी. गावभर भटकत असायचा तो. गावात सगळ्याच्या ओळखीचा होता चाचा. त्याच्या घरात कोणी नव्हतं. मग घरात जाऊन काय करणार तो… कधी वाटलं तर त्याच्या घराच्या बाहेर बसून असायचा नाहीतर गावात फिरत बसायचा. जरा वयाने होता चाचा. निल्याचे वडील आणि येडा चाचा, लहानपणीची संगती. एकत्र वाढलेले. फक्त चाचा मुसलमान होता. म्हणून त्याचं घर गावाच्या वेशीवर होतं. पण चाचाच्या घरचे सगळे खूप चांगले होते, पहिल्यापासून. हिंदू -मुसलमान असा भेद केला नाही कधी त्यांनी. सगळ्या सणामध्ये आनंदाने भाग घेयाचे. निल्याचा म्हातारा आणि चाचा , घट्ट मित्र. चाचाचे घर जरी वेशीवर असलं तरी त्याचं शेत आत गावात होतं. दोघे एकमेकांना मदत करायचे शेतीत. चाचाचं शेतं तसं खूप मोठ्ठ होतं, त्यात राबणारे हात सुद्धा खूप होते. १०-१२ माणसं होती हाताखाली. चांगलं चालायचं चाचाचे. चाचाला एक मुलगा होता. तो पण निल्याच्या वयाचा. पण लहानपणापासून शहरात शिकायला होता. कधी कधी सुट्टी असली कि घरी यायचा. चाचाच्या घरात तेव्हा तिघेच जण होते. त्याचे आई-वडील म्हातारे होऊन मेले आधीच. आता फक्त चाचा,चाची आणि त्याचा मुलगा. गावात दोघेच राहायचे. मुलगा चांगला शिकला आणि शिक्षण पूर्ण झाल्यानंतर गावात आला. चाचाचे खूप प्रेम त्याच्यावर. कोणताही हट्ट लगेच पुरवायचा. शेतावर कधी राबवला नाही त्याने त्याच्या मुलाला. थोडे महिने तो गावातच होता. नंतर म्हणाला, नोकरीसाठी शहरात जातो. तिथे पैसे लागतील. सेम निल्याच्या बाळासारखी गत. पण चाचानी त्याला पैसे दिले होते. गेला शहरात, ६ महिन्यांनी वापस गावाला. आणखी पैसे हवे म्हणून, चाचाला कळलं होतं कि त्याला शहरात वाईट संगत लागली आहे ते, तरी चाचाने पैसे दिले. गेला शहरात, यावेळी ३ महिन्यांनी आणखी पैसे मागायला दारात हजर. यावेळीस मात्र चाचाने पैसे दिले नाहीत. मोठ्ठ भांडण चाचा आणि मुलाचं. चाची मध्ये आली म्हणून भांडण थांबलं. मग काय करणार…. गावातच राहिला थोडे महिने. सुधारला गावात राहून . ६-७ महिने झाले असतील,चाचाला मदत करायचा कामात, चाचीला बरं वाटायचा. 

               एक दिवस कसलासा कागद घेऊन आला चाचासमोर, बोलला," शहरात नवीन ठिकाणी नोकरी भेटली आहे. त्यासाठी तुमचा अंगठा पाहिजे कागदावर." चाचाला  केवढा आनंद, त्यात चाचा शिकलेला नाही. पेपर न वाचताच अंगठा दिला त्याने. चाचा,चाची खूष एकदम. पेपर आणि सामान घेऊन तो गेला शहरात. ५-६ दिवसांनी , शहरातून काही मानसं आली. आणि चाचाला त्याच्याच शेतातून बाहेर काढलं. काय चाललंय कळेना. भांडण, मारामाऱ्या सुरु झाल्या. सगळे गावकरी आले धावून मदतीला. पोलिस पाटील आला. तेव्हा सगळा खुलासा झाला. चाचाच्या मुलाने सगळी जमींन विकून टाकली होती आणि चाचाने ज्या कागदावर अंगठा दिला होता तो कागद जमीन विकायचा होता. आता सगळी जमीन कायद्याने त्यांची होती, चाचा काही करू शकत नव्हता, ना गावकरी. मुलगा फसवून कायमचा शहरात गेला होता पळून. मोठा धक्का चाचाला.एवढं प्रेम केलं त्याने मुलावर, त्याने असं केलं. चाचीने तर धसका घेतला. अंथरुणावर खिळली ती कायमची. तिच्या औषधावर किती पैसे गेले चाचाचे. शेवटी मुलाचं नाव घेत मेली बिचारी. चाचा एकटा पडला. 

             शेत तर राहिलं नाही. घरात कोणी नाही. काय करणार घरात राहून. बाहेरचं बसून राहायचा तासनतास. वाटेकडे डोळे लावून. भूक लागली कि गावात फिरायचा. सगळ्या गावाला चाचाची कहाणी माहित होती. कोण ना कोण देयाचे खायला. कधी कोणी बिडी द्यायचं फुकायला.… एवढंच. बाकी तो एकटा कूठेतरी बघत , काही बाही बडबडत असायचा. बिडी ओढत निघणाऱ्या धुराकडे बघत बसायचा. हिंदीत कि कोणत्या भाषेत कविता नाही तर एखादा 'शेर' म्हणायचं. काही समजायचे नाही. जुन्या लोकांना माहित होता चाचा. नवीन मुलांना काय माहित त्याचं दुःख… त्या मुलांनीच त्याचं नावं "येडा चाचा" ठेवलं होतं. आणि गावात आता त्याला सगळे तसंच म्हणायचे. 

             चाचा निल्याला ओळखायचा. म्हणून त्याने त्याला हाक मारली. " हा चाचा… जरा शहरात जातो आहे." चाचाला मराठी कळायचे, बोलता यायचे नाही. निल्या बोलला ते कळलं त्याला. " हा बेटा… जाओ शहर में… पर वापस जरूर आना… किसको छोड के मत जाना । " चाचा बोलला आणि आल्या पावली निघून गेला बडबडत. निल्या आणि येश्याला त्याच्या मुलाची आठवण झाली. " काय रे… काय करत असेल तो शहरात ? " ,"काय माहित पण नक्की सुखी नसणार तो… हाय लागते रे अशी. बिचाऱ्या आई-बाबाला फसवून कोणाचं बरं होतं नाही कधी." बोलता बोलता दोघे S.T. stand वर आले. निल्याने शहराची दोन तिकीट काढली. गाडीदेखील वेळेत निघाली. ३ ते ४ तासाचा प्रवास. संध्याकाळ पर्यत पोहोचू असा साधा हिशोब. पण ऐनवेळी गाडी बंद पडली. driver लागला कामाला. " आता अर्धा-एक तास तरी गाडी काही हलायची नाही." कोणी एक प्रवाशी बोलला." हा…. हा…,जरा इंजिनाचा प्रोब्लेम झाला आहे. वेळ लागेल… सगळ्यांनी उतरून घ्या. " गाडीच्या driver ने सांगितलं. 

             सगळी मंडळी खाली उतरली. दोघा-तिघांनी घोळके बनवून इकडच्या- तिकडच्या गप्पागोष्टी सुरु केल्या. निल्या-येश्या असेच एका आडोश्याला उभे होते. कोणीतरी हाक दिली निल्याला लांबूनच, निल्या मागे बघू लागला कोण ते… अरेच्या… हा तर किसन… हा… हो, किसनच तो, हा पण याचं गाडीत होता, दिसला कसा नाही मग. किसन धावतच जवळ आला. किसन… निल्या आणि येश्याचा शाळेतला मित्र, दुसऱ्या गावातला.… तालुक्याच्या शाळेत तिघे एकत्र होते, तेव्हाची ओळख. "काय रे… निल्या, येश्या… किती वर्षांनी भेटतो आहे ना." किसनने आनंदाने मिठी मारली दोघांना. त्यांनाही बरं वाटलं जरा. "काय करता रे दोघे… कामाला वगैरे कूठे आहात ? " त्यावर दोघे एकमेकांकडे पाहू लागले. किसनला कळलं कि काहीतरी गडबड आहे ते. "काय झालं रे… ?" निल्याने सगळी कहाणी सांगितली. येशाची गोष्ट मांडली त्याच्यासमोर. साहजिकच वाईट वाटलं त्याला. 
" तू काय करतोस ? ",
" माझ्या वडिलाची अशीच गत झाली होती. मी नंतर शहरात गेलो शिकायला. तिकडेच असतो आता पण. इकडे वडिलांना शेतीची कामं जमायची नाही. सरळ जमीन विकून टाकली. आता इकडे काही नाही आमचं. आता सगळेच तिकडे राहतो आम्ही.",
"मग… आता इकडे कसा तू ? ".
"असाच येतो… कधी गावाची आठवण झाली कि.एक-दोन दिवस राहून पुन्हा शहरात जातो. काय ना… शहरात राहून गावपण विसरलो आहे… तेच जमवत असतो इकडे येऊन. " किसन हसत म्हणाला.  
"तुम्ही कूठे निघालात ? ",
"याचा भाऊ राहतो शहरात, त्याला भेटायला जातो आहे.",
"छान…" निल्याला काही विचारायचे होते कधी पासून. 
"किसन… विचारू का एक… ",
"विचार ना… ",
"शहरात जाऊन मानसं बदलतात का… ?",
"का रे… ",
"असंच.",
"बदलतात काही…. पण सगळी नाही बदलत… पण जास्त वर्ष राहिला एकदा तर काही सांगता येत नाही." तेवढयात गाडी सुरु झाल्याचा आवाज झाला. तसे सगळे गाडीत जाऊन बसले. 

              जरा उशिराच पोहोचली गाडी शहरात. निल्या आणि येश्याचा निरोप घेऊन किसन त्याच्या वाटेने निघून गेला. निल्या त्याच्या विचारात. 
"काय झालं निल्या ? " निल्या विचारात अजून. 
" तुला काय वाटते, आपला बाळा… बदलला असेल का शहरात जाऊन ",
" आणि असं का वाटते तुला ? ",
"जवळपास दोन वर्ष झाली. कितीवेळा त्याला फोन लावला मी, एकदाही त्याने उचलला नाही. सहा महिन्यांनी पैसे येतात तेवढेच… इकडे येऊन किती वर्ष झाली त्याला." येशाने त्याच्या खांदयावर हात ठेवला. 
"नाही रे…. असं काही वाटून घेऊ नकोस तू… चल पटकन जाऊ बाळाकडे, नाहीतर अंधार होईल." तसा निल्या तयार झाला. 

पत्ता होता त्यांच्याकडे, विचारत विचारत पोहोचले एकदाचे. मोठी सोसायटी होती ती. मोठया इमारती. इमारतींकडे बघत बघत ते गेटच्या आत शिरले. तसा watchman ने अडवलं दोघांना. 
" कूठे… आत नाही जायचं… चला बाहेर…. " watchman ने त्यांना बाहेरंच ढकललं.
" अहो… थांबा… थांबा, याचा भाऊ राहतो इथे." येश्या म्हणाला. तसं watchman ला हसायला आलं.
" हो… का, बरं… कूठे राहतो इथे तो…झोपडी नाही, सोसायटी आहे ही… ",
"अहो… खरंच याचा भाऊ राहतो इथे, रोहित पाटील… इकडेच राहतो ना… " ते नाव ऐकताच watchman ला आठवलं. 
"हा… हा, रोहित साहेब… त्यांच्याकडे आलात का तुम्ही… पण तुमच्याकडे बघून वाटत नाही कि ते तुमचे भाऊ आहेत असं…" निल्याला जरा वाईट वाटलं. 
"मग आम्ही जाऊ का तिथे… कूठे राहतात या इमारती मध्ये… " watchman ने समोर इमारतीकडे बोट दाखवत म्हटलं,"त्या इमारतीत,६ व्या मजल्यावर, दुसरी रूम… " जसे दोघे निघाले तेव्हा परत watchman ने अडवलं. " थांबा जरा… तिथे आता पार्टी सुरु आहे. त्यांना मी फोन लावून सांगू का… तुम्ही आलात ते. " तसे दोघे थांबले. त्याने वर रोहितच्या flat वर call लावला. " थांबा हा… रोहित साहेब येत आहेत खाली, स्वतः… "

                   १५ मिनिटे अशीच गेली. रोहित खाली आला नाही. watchman ने पुन्हा call लावला. यावेळी सुद्धा १० मिनिटे गेली. खूप वेळाने आला रोहित. निल्याला बघितलं तसं चाट पडला." दादा… तू… आणि इथे… " निल्याला तर किती आनंद झाला रोहितला बघून.जाऊन त्याला मिठी मारली. रोहितने त्याला जवळपास दूर लोटलं. येश्या त्याच्याकडे बघत राहिला. 
"Sorry दादा… महागातला कोट आहे रे… खराब होईल ना म्हणून…" रोहित थांबला बोलताना. येश्याला राग आला होता, पण निल्याने " काही नाही" असं खुण करून सांगितलं त्याला. 
"कसा आहेस बाळा… ", तसा रोहित त्याला बाजूला घेऊन आला. 
" दादा… please… बाळा बोलू नकोस, रोहित बोल फक्त. इथे खूप लोकं ओळखतात मला. " निल्याला हसायला आलं. 
"ठीक आहे… रोहितचं बोलीन आता, मग तर ठीक आहे ना…. बर चल… दमलो आहे ना… घरी जाऊ या का वरती…" रोहित जरा चुळबुळ करू लागला. 
" दादा… अरे, वर पार्टी चालू आहे रे… जागा नाही उभं रहायला सुद्धा… तुला कूठे घेऊन जाऊ आणि… शिवाय पाहुणे आहेत वर… त्यांना काय वाटेल तुला बघितलं कि… तू थांब ना… जरावेळ खालीच… मी काही व्यवस्था करतो तुझी.… " म्हणत रोहित watchman जवळ आला.
" हा बोला साहेब… ",
"एक काम कर… हे दोघे इकडेच थांबतील जरा वेळ… तुमची खोली रिकामी असेल ना आता.",
" हो साहेब… ", 
" मग दोघांना इकडेच बसू दे… पार्टी संपली कि बघू काय ते… " रोहितने watchman ला सांगितलं  आणि निल्याकडे आला. 
" दादा… थोडावेळ बस हा इकडे… वरून सारखे call येत आहेत, मी पार्टी संपली कि येतो.… Bye." रोहित झपझप निघून गेला. 

              निल्या आणि येश्या कधीच रोहितची वाट बघत बसले होते. येशाला तर रोहितचा राग आला होता. मी तर सोडा, निल्या तर सख्खा भाऊ आहे ना… त्याला साधं पाणी विचारलं नाही. काय भाऊ आहे… निल्या तिथूनच वर चाललेल्या पार्टीकडे बघत होता. रात्री ११.३० होते. येश्याला झोप येत होती. watchman आत आला आणि बोलला,
" हं… रोहित साहेब आले आहेत बाहेर… बोलावलं आहे त्यांनी." निल्या आणि येश्या बाहेर आले.… रोहित आणि त्याची बायको, अंजली बाहेर उभे होते. 
" किती वेळ झाला ना… जाऊ या का वर… " निल्या बोलला, अंजली त्यांच्याकडे बघत बोलली,
" No way रोहित… आताच पार्टी झाली आहे आणि यांना वर…. " म्हणत तरातरा निघून गेली. रोहित अंजलीला थांबवत होता.… ती कूठे थांबली… रोहित पुन्हा निल्याकडे आला. 
" sorry दादा… आता घरात खूप गडबड आहे… सापसफाई बाकी आहे… ",
"मग… ",
"आजची रात्र थांबशील का इथेच खाली… शिवाय आता खूप थकलो आहे मी, उद्या सुट्टी आहे मला, उद्याच बोलू… चालेल ना…" निल्या काय बोलणार त्यावर… 
" ठीक आहे बाळा… थांबतो खालीच. " रोहित रागावला. 
" please यार…. बाळा नको बोलूस… उद्या बोलू आपण… Good Night… " रोहित निघून गेला.

                येशाला अजून राग आला. निल्या गप्प watchman च्या खोलीत येऊन बसला. येश्या त्याच्या बाजूला बसला. " अरे… काय पद्धत आहे हि… मोठा भाऊ ना तू, एवढा धिंगाणा चालू होता वरती, जेवलास का ते तरी विचारलं का त्याने…" निल्याने येश्याला गप्प राहायला सांगितलं. " अरे… खरोखर दमला असेल तो… आणि जना वहिनींनी एवढं छान झुणका-भाकर दिली आहे ती… ती तर किती आवडते मला." येश्याने पुढे काही शब्द काढला नाही तोंडातून. गप गुमान झुणका-भाकर घेतली. त्याला तर आधीच झोप आली होती, जेवल्या जेवल्या लगेच झोपी गेला तो. निल्याही पडला जरा. दमलेला तोही… अनोळखी जागा, झोप लागेल तर शप्पत. येश्या आधीच गाढ झोपला होता. निल्या तसाच विचार करत राहिला पडून. उद्या बाळा सोबत मनसोक्त गप्पा मारू. त्याने पैसे दिले कि लगेच म्हातारीच operation करू मोतीबिंदूच… त्यातून बाबांच्या औषध बघू मग… पैसे उरलेच तर घेऊ काही बायकोसाठी… किती मोठा झाला ना बाळ आपला… केवढं मोठठ घर… सुनबाई पण इंग्रजीमध्ये बोलते. किती लोकं कामाला आहेत बाळाकडे काय माहित… खूप शिकलं कि असं होते… मी पण शिकलो असतो तर… कदाचित माझं सुद्धा असच मोठा घर असतं… जाऊ दे पण… बाळाकडे आहे ना सगळं… त्यात खूष आहे मी… 

                रात्रभर निल्या विचार करत राहिला. सकाळ होण्याची वाट बघत होता तो. सकाळ होता होताच त्याचा डोळा लागला. १५-२० मिनिटे झोपला असेल तो. येश्या उठला तसं त्याने निल्याला जाग केलं. " निल्या… ये निल्या… ऊठ लेका… " डोळे चोळत निल्या उठला. watchman कडून पाणी घेतलं आणि तोंड , हातपाय धुवून घेतले. बाळाकडे जायचे ना मग कसं ताजतवान झालं पाहिजे म्हणून दोघे झटपट तयार झाले. 
" जाऊ का वर आम्ही… " निल्याने watchman ला विचारलं. " थांबा जरा… वरती फोन लावून विचारतो मी. " त्याने फोन लावला… कितीवेळ फोन वाजत राहिला. उचलला नाही कोणी. असंच अजून ३-४ वेळा झालं. " बाळा झोपला असेल अजून… " मनात म्हणत निल्या खालीच थांबला. अर्धा-पाऊण तास झाला असेल. पुन्हा फोन लावायला सांगितला निल्याने. यावेळेस उचलला फोन. " हा… तुम्ही थांबा खालीच… साहेब येत आहेत खाली… " watchman म्हणाला. 

                 १५ मिनिटांनी रोहित खाली आला. " चल दादा… " रोहित म्हणताच निल्या, येश्या त्याच्या मागून चालू लागले. केवढी मोठ्ठी सोसायटी.… ऐसपैस अगदी, त्यात दोन swimming pool सुद्धा… निल्या क्षणभर जागीच थबकला. किती स्वच्छ पाणी… इतक्या वर्षात पहिल्यांदा तो तसं नितळ पाणी पाहत होता. गावात तर मचूळ पाणी असायचे, मातकट पाणी… कधी लाल रंगाचे पाणी… तसाच पुढे गेला आणि पाण्याला स्पर्श केला त्याने… आणि मागून आवाज आला. 
" Hey you… " निल्याने वळून बघितले. एक माणूस त्याला ओरडला होता. " काय चाललाय हे… कळत नाही का, पाण्यात काय हात घातलास… श्शी !!!!! …. काय कपडे ते… सगळं पाणी खराब करून टाकलस… watchman " तसा watchman धावत आला. " कूठे लक्ष आहे रे तुझं…. या भिकाऱ्यांना आत कसं येऊ दिलंस …. बाहेर काढ त्याला पहिला… ", 
" साहेब… ते रोहित साहेबकडे आलेत… " रोहितला मेल्याहून मेल्यासारखं वाटलं.
" Mr. Rohit…. is that true…. " रोहितने उसनं हसू आणलं चेहऱ्यावर. 
" yes…. actually... they are my new servant's…. ",
"ohh … i see… " दोघांचे 'english' संभाषण संपलं. 
" watchman…. पाणी बदलून घ्या सगळं लगेच… " म्हणत तो निघून गेला आणि अजून कोणी विचारायच्या आधी रोहित दोघांना घेऊन flat वर आला. 

                  निल्याचे १२ वी पर्यंतचे शिक्षण मराठीतून झालं असलं तरी " servant's" शब्दाचा अर्थ " नोकर " होतो, हे माहित होतं त्याला. जरा मनातून दुख्खी झाला तो. तरी बाळाची इकडची ओळख खराब होऊ नये म्हणून तो काही बोलला नाही. निल्या आणि येश्या जसे flat वर आले , तशी अंजली रोहितला ओरडलीच,
" what is this rohit,… आताच सफाई करून घेतली ना… आणि यांना घेऊन आलास वर… पुन्हा घाण होणार… कशाला आणलस त्यांना रूमवर… आहेत कोण एवढे हे दोघे…. " रोहितने तिला 'शांत राहा' अशी खूण केली. 
" हा… माझा दादा आहे… मोठा भाऊ… आणि हा येश्या दादा… " तेव्हा अंजली कूठे शांत झाली. 
" ठीक आहे… पण सोफ्यावर नको बसवूस… खराब होईल." म्हणत ती आत निघून गेली. निल्याला काय बोलू ते कळत नव्हतं. रोहित चुळबूळ करत होता. " बस ना दादा…" दोघे खाली जमिनीवर बसले. रोहित सोफ्यावर बसला. थोडयावेळाने अंजली बाहेर आली आणि रोहित च्या बाजूला news paper घेऊन बसली वाचत. कोणीच काही बोलत नव्हतं. थांबून निल्याने बोलणं सुरु केलं. 

" कसा आहेस बाळा…. ",
"दादा… बाळा नको बोलूस ना… ",
"ठीक आहे… कसा आहेस… ",
"मी… ठीक आहे… " एवढचं बोलला.
" आणि सुनबाई… तुम्ही कश्या आहात ? " तिच्याकडून कोणतंचं उत्तर आलं नाही. पुन्हा शांतता. यावेळेस रोहित बोलला," काही काम होतं का दादा… आणि फोन करून यायचे ना….  ",
"तुला आवडलं नाही वाटते… मी आलो ते… " ,
"तसं नाही दादा… इकडे पार्टी सुरु होती आणि तुला बघितलं असतं तर लोकांनी… " येश्याला राग आला. 
" मग काय… लाज वाटते का भावाची… " ,
"येश्या … गप्प जरा… राहू दे." निल्याने पुन्हा गप्प केलं येश्याला. 
" बाळा… जास्त वेळ घेत नाही तुझा…मला काही पैशांची गरज होती म्हणून आलो तुझ्याकडे…. " ते ऐकून अंजलीच्या कपाळावर आट्या आल्या. रोहितही काही बोलला नाही त्यावर. 
" रोहित बाळा… पैसे पाहिजे आहेत…. करशील ना मदत.".  त्यावर अंजली बोलली ,
" कशाला पाहिजे पैसे… आणि आधी सांगायचे ना… आताचं किती खर्च झाला आहे. आता नाही भेटणार पैसे. " निल्या , अंजलीकडे बघत राहिला. रोहितने बोलायला सुरुवात केली. 
" हा दादा… पार्टीत खूप खर्च झाला, त्यात flat च्या maintenance चा चेक देयाचा आहे उद्या. शिवाय २७ तारीख आहे. महिना अखेरीस पैसे मागायला आलास. कुठून देऊ पैसे तुला. फोन केला असतासं तर काहीतरी करता आलं असतं. तरी तुला पैसे पाठवले होते मी, तरी आता पुन्हा पैसे पाहिजे.",
" अरे बाळा… बाबांच्या औषधांचा खर्च असतो आणि आता आईच्या दोन्ही डोळ्यांना मोतीबिंदू झाला आहे ना… त्याचं operation करायचे आहे म्हणून आलो रे… " 

रोहित त्यावर काही बोलला नाही, खूप वेळाने अंजली बोलली. 
" पण एवढया म्हाताऱ्या माणसाचे operation करून काय उपयोग आहे का… पुन्हा त्या operation चा success rate फार कमी असतो. उगाचच पैसे वाया जाणार.… ",
"काय म्हणायचे आहे तुला सुनबाई… " निल्या रागातच बोलला जरा.
" दादा… थांब जरा… " निलेशला राग आलेला बघून रोहित मध्ये बोलला. " दादा… थोडे दिवस थांब… आता लगेच पैसे देऊ शकत नाही तुला…. शिवाय अंजली सुद्धा बरोबर बोलते. या वयात  operation  करून आईला चांगलं दिसेल असं नाही ना… अजून किती दिवस आहेत नाहीतरी… " रोहित ओघातच बोलून गेला. त्याला कळलं होतं काय बोलला ते. 
" रोहित !!! " निल्या ओरडलाच." अजून किती दिवस राहिलेत म्हणजे…. असच मरू देऊ का तिला… पैसे देयाचे नसतील तर नको देऊस…. काय भिक मागायला आलो नाही तुझ्याकडे… माझ्याकडे नाही म्हणून वाटलं… तू तरी मदत करशील.… तर बोलतोस किती दिवस राहिले आहेत… " रोहित शांत… 
" तो बोलतो आहे ना, आता पैसे नाहीत आमच्याकडे…. नंतर या तुम्ही… " अंजली बोलली. 
" हा दादा…. please… समजून घे ना यार… खरंच पैसे नाही आहेत." पुन्हा निल्याचा पारा चढला.
" यार… ? काय रे… यार आहे का तुझा मी.… आणि पैसे नंतर घेऊन काय करू…… आता गरज आहे operation साठी.",
"मग तुला पाठवले होते ना पैसे… ",
" कधी… ? सहा महिन्यापूर्वी… आणि किती… २००० रुपये.…. २०,००० रुपये पाहिजे आहेत operation साठी, औषधांच्या खर्चासाठी… आणि बोलतो नंतर ये… पैसे संपलेत बोलतो, एवढया पार्टीसाठी पैसे आहेत. आणि operation साठी २०,००० नाहीत तुझ्याकडे.... गरज होती आता. " ,
" एवढीच गरज होती तर इकडे कशाला यायचं… तिकडेच गावात ते असतात ना सरपंच… नाहीतर बँका…गहाण ठेवतात ना इतर लोकं पण. तसं ठेवायचं काहीतरी… " अंजलीचे बोलणे ऐकले आणि निल्या भडकला. येश्या त्याला शांत करत होता तरी तो ऐकेनाच.
" गहाण… मीच राहिलो आहे आता… बाकी सगळं त्या सावकाराकडे आहे. माझ्या बायकोच्या अंगावर एक दागिना नाही. साधं मंगळसूत्र नाही गळ्यात तिच्या… का… विकलं ते … एवढं मोठ्ठ शेत होतं. कोणासाठी ते विकलं… म्हातारा भांडायचा… बोलायचा नको विकू जमीन, लक्ष्मी आहे ती. नाही ऐकलं त्याचं… मी स्वतः शिकलो नाही जास्त. किती होतं मनात… पण तुला काही कमी पडू दिलं नाही. केवढं वाटते तुझ्याबद्दल गावात…,  आई… दिसत नाही बरोबर तिला तरी येताना बोलली, जमलं तर घेऊन बाळाला… का… प्रेम आहे म्हणून ना… इकडे पैसे नाहीत म्हणून सांगतो आहे… "

रोहित निमुटपणे ऐकत होता. अंजली गप्पपणे बसून होती फक्त.
" बाबांना अजून वाटते कि तू परत येशील म्हणून गावात.… आणि बोलतोस किती दिवस राहिले आहेत… मघाशी काय बोललास… servant… आम्ही काय नोकर आहोत तुझे… एवढी लाज वाटते दादाची.… अरे, एवढासा होतास, तेव्हापासून वाढवलं तुला. त्या आई-बाबांनी कधी चंगळ केली नाही… तू पुढे जावसं म्हणून… आणि तू …,    सुनबाई बोलते.… गहाण ठेव, अरे त्या गावात येऊन बघ जरा…पाणी पियायला काय बघायला मिळत नाही. दुष्काळ पडला आहे, शेतकऱ्याच्या सगळ्या जमिनी खडकाळ झाल्या आहेत. सगळ्यांची घरं… शेतं… त्या बँकेत नाहीतर सावकाराकडे… सगळ्यांचे हाल होतात.… ज्याना बघवत नाही कुटुंबाची हालत, ते देतात जीव मग… कुठून आणणार पैसे… सांग मला… मला फक्त २०,००० पाहिजे होते ते. माझ्यासाठी नाही. त्या आईसाठी… बाबांसाठी, मीही आत्महत्या केली असती… पण हिम्मत होत नाही. माझ्यानंतर कोण बघणार त्यांच्याकडे..... म्हणून आलो तुझ्याकडे. कोणासमोर हात पसरायचे आता… तर तुझ्याकडे आलो… तर इकडे सोहळे चालू आहेत… आई-वडिलांना विसरलास का… ",
"पण सध्या… किती लोकं मदत करतात ना, शेतकऱ्यांना… मग suicide कशाला करायचं." अंजली बोलली. निल्या काही बोलला नाही त्यावर. थोडावेळ झाला. शांत झाला निल्या आणि म्हणाला,
" इकडे मोठ्या घरात राहून, सुखात राहून बोलता येते सगळं. तिथे येऊन बघा गावात.… मग कळेल, लोकं कशाला आत्महत्या करतात ते. मीही करू शकलो असतो, पण नाही करणार… ",
" मी ऐकलं आहे कि सरकार १ लाख देते… आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबाला… " अंजली पटकन बोलून गेली, निल्याला मनात लागलं ते. 

सामान उचललं आणि निल्या येश्याला बोलला, " चल… गावाला… " येश्या गपगुमान बाहेर पडला.
" दादा… दादा, थांब ना… प्रयन्त करू काहीतरी." निल्या थांबला. त्याच्या डोळ्यात अंगार फुलला होता.
" प्रयन्त ?? इकडे माणसाची किंमत नाही… आणि म्हणे फोन का नाही केलास… २ वर्षापासून एकतरी फोन उचललास का… २०,००० पाहिजे होते फक्त… पण नको आता, म्हातारा असाच मेला तरी चालेल , म्हातारी आंधळी झाली तरी चालेल.… तुझ्याकडे येणार नाही पुन्हा… कधीच नाही. ते पैसे साठवून ठेव…. तुझ्या पार्टीसाठी… ",
"दादा… असं का बोलतोस… मला वाटलं , तुला पाहिजे असतील पैसे… थांब ना… ",
"बाळा, आता नको काही… भरलं मन… तुझं सुख बघून… आणि शेवटी… आम्ही नोकर ना तुमचे… जातो मी… गावात कधी येऊ नकोस आणि मी तुझ्याकडे येणार नाही परत.… सहा महिन्यांनी पैसे देतोस ना, तेही नको पाठवू… पाठवलेस तरी ते घेणार नाही मी… माझा भाऊ हरवला हेच  समजीन आता." म्हणत निल्या निघाला. त्या मागोमाग येश्या… रोहित तसाच पाहत राहिला दोघांकडे.  

               जी पहिली गाडी भेटली, गाडीने ते दोघे गावाला आले.… तालुक्याला… खूप काही इच्छ्या होत्या मनात निल्याच्या. खूप गोष्टी ठरवून तो रोहितकडे गेला होता. पैसे तर भेटलेच नाही. अपमान तेवढा पदरी पडला त्याच्या. नोकर बोलला त्याला रोहित. साधं जेवायला बोलावलं नाही त्याने. सुनबाई… अंजली, बोलली कि सोफ्यावर बसवू नका. खराब होईल… हीच का माझी लायकी, एवढं कष्ट करून वाढवलं त्याला. ते हे सगळं अनुभवायला का… किती विचार होते त्याच्या मनात… येश्या त्याच्या बरोबर चालत होता. त्यालाही माहित होतं कि किती त्रास होतं असेल निल्याला. तसेच गप्प चालत होते. चालता चालता येश्या बोलला,
" निल्या… जाऊ दे, जे झालं ते… असं एकदम नातं तोडू नकोस… " निल्या तरी गप्प. निल्याला थांबवलं त्याने," निल्या ऐक… भाऊच आहे ना… लहान आहे अजून… सोडून दे विषय… राग नको ठेवूस मनात हा… माफ कर त्याला." ,
"माफ करू… अरे , ती सुनबाई… काय बोलली, कशाला operation करता, पैसे वाया जाणार… आणि बाळा… तो काय बोलला, अजून किती दिवस उरलेत म्हातारीचे… हे ऐकण्यासाठी गेलो होतो का तिथे.… नोकर आहोत का आपण, बोल तू… " येश्या शांत होता. 
" जाऊ दे चल… घरी जाऊ… वाट बघत असतील सगळे.".
"काय सांगू रे घरी जाऊन… सांग आहे काही सांगायला… operation तर करायलाच पाहिजे… कूठून आणू एवढे पैसे मी… काही सुचत नाही." निल्या आणि येश्या एकमेकांकडे पाहू लागले. 

" ठीक आहे, येश्या तू घरी जा… हा, पण माझ्या घरी नको जाऊस. मी नंतर येतो घरी.",
"कूठे चाललास ?",
"डोके दुखते आहे खूप… शांत झालं कि जातो घरी." येश्याला माहित होतं, किती तणावात होता तो.
" चालेल पण लवकर घरी जा… " म्हणत येश्या निघाला घरी. निल्या तिथेच घुटमळत होता. अजूनही त्याला ते सगळं संभाषण आठवत होतं. खरंच पैसे हवे होते, नाहीतर म्हातारीला कधीच बघता येणार नाही. औषधाचे पैसे, ते सुद्धा आवश्यक होते.कुठून आणू पैसे. चालता चालता तो त्याच्या शेताजवळ आला. किती हिरवं असायचं एकेकाळी, किती छान वाटायचं तेव्हा…शेत उभं असतं तरी म्हातारीच operation झालं असतं. का असं वागला बाळा… खरंच , पैसा मोठा झाला आहे, माणसापेक्षा.

                कितीवेळ निल्या शेताकडे बघत होता.काहीच नाही राहिलं, गहाण ठेवायला. मी राहिलो आहे तेव्हढा आता. काय करू, काय करू… निल्या डोक्याला हात लावून बसला होता. तेवढयात त्याला अंजलीचे शब्द आठवलं." सरकार १ लाख देते, आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबाला… " क्षणभर तो विचार मनात डोकावला त्याच्या. १ लाखात खूप काम होतील, operation होईल… बाबांच्या औषधाच्या खर्च निघेल. शिवाय माझं कर्ज माफ होईल. खूप काम होतील. फक्त मी नसेन, तसं पण मी जिवंत राहून त्यांच्या उपयोगात पडत नाही आहे.निदान माझ्या मरण्याने त्यांना काही फायदा होईल. नक्कीच होईल. तेवढं तरी करू शकतो मी. निल्याने नक्की केलं. दोरी तर नाही आपल्याकडे… शेतात एक पडकी झोपडी होती निल्याच्या. धान्य साठवण्यासाठी, पण गेली काही वर्ष एवढं पीक आलचं नव्हतं साठवण्यासारखं… तेव्हापासून ती जागा रिकामी असायची. निल्या काहीतरी शोधत होता तिथे. खुपवेळ… हा, सापडलं एकदाचं… कीटकनाशक, औषध… शेतात फवारणी करायचा, कीड लागू नये म्हणून… आता पिकचं नाही तर फवारणी कूठे करणार…तसचं पडून होतं ते. बाटली होती सगळी भरलेली.… तेच पिऊन झोपू, सकाळपर्यंत खेळ खल्लास…

                  निल्या ती बाटली घेऊन घरी निघाला. मधेच थांबला, घरी गेलो तर विचारत बसतील सगळे… कशाला आणली बाटली म्हणून, शिवाय त्यांच्यासमोर पिऊ शकत नाही मी. कूठे जाऊ… हा, दगडाचं झाड… तिथेच जाऊ… किती जवळच होतं ते झाडं त्याच्या. लहानपणापासून त्याने सावली दिली मला… प्रेम केलं, त्याच्या सोबतीनेच जीव सोडू… निलेश निघाला. शेवटचं त्याने शेताकडे बघून घेतलं. कंठ दाटून आला त्याचा. शेतातली माती त्याने उचलली आणि त्याचा कपाळाला टिळा लावला. थोडी माती त्याने त्याच्या सदऱ्याच्या खिशात भरून घेतली. पुन्हा एकदा पाहिलं शेताकडे आणि निल्या तडक दगडाच्या झाडाजवळ आला. 

                 रात्र झाली होती. निल्या झाडाजवळ पोहोचला. तिथून गावाकडे नजर टाकली आणि निर्णय पक्का केला त्याने. झाडाजवळ येऊन बसणार इतक्यात त्याला तिथे 'येडा चाचा' बसलेला दिसला. आता चाचाला एवढं दिसायचं नाही नीटसं तरी त्याने ती बाटली सदऱ्यात लपवली. निल्याजवळ येताच चाचाने त्याला ओळखलं.
"अरे बेटा… आगये तुम…",
"हा चाचा… " म्हणत निल्या त्याचा जवळ येऊन बसला. चाचा गेला कि ते पिऊ, असं निल्याने ठरवलं.
" बेटा… क्या हुआ…. चूपचाप बैठे हो… " ,
"काही नाही चाचा… शहरात गेलो होतो ना… दमलो आहे ना म्हणून. " चाचा वरती आभाळात कूठे तरी बघत होता. "शहर में… शहर सें याद आया… मेरा भी कूछ अपना खोगया हें शहर में… मिला कोई तुम्हे… मेरा… " काय बोलणार चाचाला… माझचं इकडे सगळं हरवलं आहे आज. शहरात जाऊन माणसं बदलतात हेच खंर… माणुसकी नाहीशी होते तिथे. नाती राहत नाहीत. असली तरी ती काचेसारखी असतात. एकतर ती तुटतात नाहीतर त्यावर कायमचे ओरखडे राहतात. येश्या बोलायचा, माणूस गेलं कि त्याची किंमत कळते सगळ्यांना. अशीच आज मी माझी किंमत ठरवली आहे… १ लाख… 
"चूप क्यो हो बेटा… बोलो, मिला कोई… " ,
"हा चाचा, मिळाला… पण तो आता आपला नाही राहिला. खरतर कोणीच नसते आपलं… फक्त सोंग घेतली असतात सगळ्यांनी." निल्याच्या डोळ्यात पाणी आलं.
" किती ठरवलं होतं मी… खूप शिकायचं, ते राहून गेलं…. नंतर ठरवलं, खूप मेहनत करून सगळ्यांना खूष ठेवायचं, ते जमलं नाही… म्हटलं, बाळाला शिकवून मोठ्ठ करू, आई-वडिलांना सुखात ठेवेल, तर तो अनोळखी झाला आता… किती अपेक्षा ठेवल्या होत्या आयुष्याकडून… काहीच झालं नाही चाचा. " निल्या ढसाढसा रडू लागला. चाचा अजूनही वर चमकणाऱ्या चांदण्याकडे बघत होता. खूप वेळाने चाचा बोलला. 
" हमने भी जिंदगी सें बहुत कूछ मांगा था,पर जिंदगीने ही बहुत कूछ ले लिया हमसें । हमने भी जिंदगी सें बहुत कूछ मांगा था,पर जिंदगीने ही बहुत कूछ ले लिया हमसें । बस खुदख़ुशी मत करना बेटा…. अच्छे लोंगो कि कमीसी हो गयी हें । " 

                 चाचा थोडसच बोलला. पण किती अर्थ होता त्यात. निल्या बघतच राहिला चाचाकडे. चाचा उठला आणि तसंच काही बडबडत निघून गेला. निल्याचे डोळे खाड्कन उघडले. काय करत होतो आपण. सदऱ्यात लपवून ठेवलेली कीटकनाशकाची बाटली त्याने बाहेर काढली. हातात धरून तिच्याकडे पाहू लागला आणि नजर गेली ती लांब चालत जाण्याऱ्या चाचाकडे… चाचाने तर सर्वस्व गमावलं होतं… मुलगा, चाची आणि त्याचं शेत, लक्ष्मी त्याची. त्याचं दुःख आपल्यापेक्षा किती मोठ्ठ आहे,  तरी त्याने स्वतःला संपवलं नाही. आणि आपण एवढे धडधाकट असून एवढ्याश्या कारणामुळे आत्महत्या करायला निघालो. किती पळपुटे आहोत आपण. अंगात जेव्हडा जोर होता , तो सगळा एकवटून त्याने ती बाटली दूर फेकून दिली. डोळे पुसले आणि घराकडे निघाला. 

            आता पडेल ते काम करायचे आणि पैसे साठवायचे… म्हातारीचं operation करायचे…. पण पुन्हा जीव द्यायचा विचार मनात आणायचा नाही. निल्या विचार करत करत घरी आला. खूप रात्र झाली होती आता. घरात बघतो तर सगळेच जागे… निल्याला येताना बघून त्याची बायको आत धावत गेली आणि एक ग्लास भरून पाणी घेऊन आली. निल्या बाहेरचं बसला. त्याची आई आली मागोमाग…. 
" काय रं… कसा हाय बाळा… ", निल्या मनातल्या मनात हसला. तो हिचे दिवस मोजतो आहे आणि हि अजून त्याची तब्येत विचारते.
" नाय भेटला बाळा तुझा… जा झोप आत … " म्हातारी कावरीबावरी झाली. 
" काय बोलतू हायस तू…. ",
" अगं…. त्याचा पत्ता नाय सापडला… जाईन नंतर कधी परत… जा झोप जा तू…. रात लय झालीय… ". म्हातारी आत गेली. 

निल्याची बायको त्याच्या बाजूला येऊन बसली. 
" अवं …. जेवला नसाल ना… घ्या काहीतरी खाऊन… ",
" नको आता… रात्र जास्त झाली… " निल्या सावकाश बोलला. 
" कसं असतं वं शहर… म्या कधी बी नाय गेली तीत… लय पानी असलं ना तीत… शेत बी डोलत असतील ना तीत… " निल्याला पुन्हा रोहितचे शब्द  आठवले. खूप वेळाने निल्याने उत्तर दिलं.
" पाणी , मानसं…. दोन्ही बी खूप आहे तिथं… तरीपण शहरात दुष्काळच आहे… आपल्या गावापेक्षा मोठा दुष्काळ आहे तीत… दुष्काळ…. माणुसकीचा… " 

--------------------------------------------------The End--------------------------------------   

Thursday 12 November 2015

दुष्काळ… (भाग १)

                  " मग… काय विचार केला आहेस निल्या… ? ", निलेशची तंद्री लागली होती कूठेतरी. यशवंतने त्याला पुढे काही विचारलं नाही. तोही इतरत्र नजर फिरवू लागला.सगळी जमीन तापली होती, गरम तव्यासारखी. सगळीकडून नुसत्या गरम वाफा निघत होत्या,गरम वाफा.… एवढ्या लांब बसलेला असून सुद्धा डोळ्यांना त्या जाणवत होत्या. निलेश मात्र कधीचा त्याच्या शेताकडे पाहत होता. मोकाट जमीन अगदी. निल्याचं शेत होतं म्हणून माहित सगळ्यांना, नाहीतर कोनालाही पटलं नसतं कि ते शेत आहे म्हणून. इतकं निर्जीव वाटत होती जमीन. गेलाबाजार, एक रानटी रोप पण नव्हतं शेतात.…. पाखरं सुद्धा फिरकत नसायची. काय होतं त्यात खाण्यासाठी. तेवढं ते एक बुजगावणं , येणाऱ्या वाऱ्याशी डोलत असायचं. त्याच्यावर फाटका हिरवा शर्ट होता, तेव्हढंच काय तो हिरवा टिपका शेतात. शेतातली विहीर…. त्यात फक्त दगड-धोंडे दिसायची. नाहीतर कोपऱ्यात कोळ्याने सुंदर असं नक्षीकाम करून विणलेलं जाळं होतं, जणू काही मोत्याचा दागिना…. एक-दोनदा निल्यासुद्धा बाचकला होता ते बघून. सकाळचं ऊन त्यावर पडलं कि कसं लखाकून जायचे ते… शेवटी जाळचं ते… निल्याने नाही तोडलं कधी ते. बाकी विहिरीत, पाण्याचा वास सुद्धा आला नाही कधी. एक वर्षापूर्वी कर्ज काढून, स्वतः मेहनत करून त्याने विहीर खणली होती. पाणी तर लागलं नाही कधी, त्यावर कर्ज अजून वाढवून ठेवलं. 

               यशवंतने पुन्हा विचारलं निल्याला," निल्या… अरे काय ठरवलं आहेस… ? ", तेव्हा निलेश भानावर आला.
" हं… हो… जातो आहे शहरात… म्हातारा मागे लागला आहे ना. म्हातारी बी सारखी टोचून बोलत असते… ती तरी काय करणार म्हना… जीव आहे ना तिचा… बाळावर … " निल्या बोलता बोलता थांबला. 
" काय झालं रे… ", येश्याने विचारलं. 
" नाही रे… आठवण झाली बाळाची…. कसा लहानपणी दंगा करायचा…. आठवतंय ना तुला पण ",
"हो रे… पण आता मोठा झाला ना तो… ",
"हो… माझ्यासाठी अजून लहानच आहे तो. चल मग… जाऊ आपण बाळाकडे… येशील ना तू… ",
" अरे मी कशाला… ? ",
"बघ येश्या… मला शहरात जास्त कळत नाही… १०-१२ वर्ष झाली शहरात जाऊन. बाळ… तेव्हा १० वीला असेल. तेव्हा गेलेलो. त्याच्या लग्नाला पण जाता आलं नाही. तुला माहित आहे ना शहरातलं म्हणून चल बरोबर जरां. ",
" तसं मला पण जास्त माहित नाही रे, पण तुझ्यासाठी येईन…. नाहीतरी इथे आता काय काम आहे आपलं… " त्यावर दोघेही हसले. 

                  यशवंत आणि निलेश, दोघेही लंगोटी यार…. गावातल्या एकाच वाडीत राहायचे. गावापासून ४ मैल अंतरावर असलेल्या शाळेत दोघे पायी-पायी जायचे. तालुक्याची शाळा लांबच होती तशी. १०वी पर्यंतच शिक्षण होतं तिथे. तिथून आणखी पुढे ४ मैल एक कॉलेज होतं १२ वी पर्यंत. एवढया लांब कोण पायपीट करणार. म्हणून गावातली ४-५ डोकीच तेवढी शिकलेली. यशवंत आणि निलेश दोघेही शिकलेले. अभ्यासात दोघांची डोकी चांगली. दोघांचं कुटुंब शेतीत गुंतलेलं. येश्याचे वडील लहानपणीच वारलेले. त्याचा काका आणि आई राबायचे शेतात. त्याने १२ वी शिकून शिक्षण सोडून दिलं. निल्याला पुढे शिकायचं होतं. ऐनवेळेला त्याच्या वडिलांना अपघात झाला आणि ते जागेवर बसले. सगळं घर शेतावर चालायचं. घरात लहान भाऊ सुद्धा होता. त्याचं शिक्षण होतं. १२ वी शिकून त्याने शिक्षणाचा निरोप घेतला. आणि स्वतःला शेतात जुपलं. दोघे शिकलेले होते. म्हणून दोघांची भाषा गावरान वाटायची नाही कधी… गावात काही कागदपत्राचं काम असेल तर गावकरी या दोघांकडे जायचे.    

                 " अवं… झोपताय न आता… " निल्याच्या बायकोने त्याला हाक मारली. निल्या झोपडी बाहेर बसला होता. बायकोचा आवाज ऐकला त्याने. दुर्लक्ष करत त्याने गोधडी घेतली खांदयावर. " आये… जरा येश्याकडं जाऊन येतु गं… " निल्याने बाहेरून आवाज दिला. " आता कूटं चाललास मरायला… इतक्या रातीचा… " म्हातारी आतून ओरडली. त्याकडे सुद्धा लक्ष न देता निल्या निघाला. १० पावलांवर येश्याचं घर… घर कसलं, झोपडीच ती.… गावात पक्क घर फक्त गावच्या सरपंचाचं. श्रीमंत माणूस, तेवढाच मनाने बी श्रीमंत. कोनालाबी पैशाची मदत करायचा,व्याज न घेता. कितीतरी गावकऱ्याच्या जमिनी त्याकडे गहाण ठेवलेल्या. सरपंच चांगला माणूस होता, पण त्याची बायको कपटी होती. सगळ्या गावकऱ्यावर तिचा काय राग होता काय माहित. तशी ती लहानच होती, १५ वर्ष लहान सरपंचापेक्षा. म्हणून तिचं काही चालायचं नाही त्यापुढे. मुग गिळून गप राहायची. येवढा चांगला होता सरपंच. पण देवाला ते बघवलं नाही बहुदा. तापाचं कारण झालं आणि चालता-बोलता माणूस अचानक गेला. खूप लोकं रडले तेव्हा. देवापुढे काय चालणार कोणाचं. थोडे दिवस दुःख केलं त्या बाईने. बारावं झालं तसं तिने रंग दाखवायला सुरु केलं. सरडयाची जात ती. जेवढे पैसे सरपंचाने दिले होते, त्यावर व्याज लावून दामदुपटीने ती परत घेऊ लागली. गाववाले काय करणार… जमिनी परत पाहिजे तर पैसे तर दयावेच लागणार. त्यात पाऊस कमी झालेला. काही जणांनी शेती-जमिनी गमावल्या. त्यात येश्याचं शेत पण होतं. लग्नासाठी शेतं उसनं ठेवलं होतं. शेतावर २ वर्ष काही पिकलंच नाही. पैसे कसे देणार. गेलं शेतं. पोट भरण्यासाठी येश्या असंच कूठेतरी काम करायचा गावात. 

                   निल्या, येश्याच्या झोपडीजवळ आला. एक दिवा तेवढा जळत होता. जना ( येश्याची बायको ) बाहेर चुलीजवळ भाकऱ्या थापत बसली होती. " जना… ये जना, येश्या हाय का घरात… " निल्याने लांबूनच विचारलं. " ते व्हय… दगडाच्या झाडावर गेलं असतील… " भाकरी तव्यावर टाकत जना बोलली. भाकरीचा खमंग वास निल्याच्या नाकात शिरला. येश्याची जना, जेवण चांगलं बनवायची. निल्या मुद्दाम यायचा कधी येश्याकडे जेवायला. आपली बायको काय जेवण करते.… नुसतं जेवायचं म्हणून जेवण ते. ना त्याला चव ना ढव.… ढकलायचं नुसतं पोटात. भाकरीचा वास अजून त्याच्या नाकात तसाच होता. निल्या जरा घुटमळला तिथे. जनाला कळलं ते. " या भावजी… एक तुकडा टाका तोंडात भाकरीचा." ,"नको… राहू दे." म्हणत निल्या पुढे आला. तिथूनच थोडं वर असलेल्या पठाराकडे त्याने नजर टाकली. येश्या झाडाजवळ बसला होता. दगडाचं झाड. दोन मोठया खडकामधून ते झाड वर आलं होतं. बऱ्यापैकी मोठं झाडं होतं. कधीपासून होतं ते माहित नाही. पण निल्यापेक्षातरी मोठं होतं ते. किमान त्याच्या आजोबाच्या वयाचं तरी असेल. आजोबा आता नव्हता,तरी झाडं होतं. निल्या आणि येश्याचं आवडीचं ठिकाण. कितीही आग होतं असली तरी या झाडाखाली शांत सावली असायची. झाडाखाली बसलं कि सगळ गाव दिसायचा. दूरवर पसरलेली शेतं दिसायची, कोणाकोणाची.  त्या दगडावर झोपलं कि फक्त निळे आकाश दिसायचे, अन रात्री लाखो चांदण्या. दोन झाडं आणि त्यातून आलेलं झाड, म्हणून त्याला दगडाचं झाडं म्हणायचे सगळे. ३ वर्ष पाऊस नसूनही त्या झाडाला कुठून पाणी मिळायचं काय माहित. निल्या आणि येश्या लहानपणापासून यायचे तिथे. कधी झोपायला, कधी नुसत्या गप्पा मारायला. 

                   निल्या येश्याच्या बाजूला येऊन बसला. येश्या लांब कूठेतरी पाहत होता. हा… येश्याच शेत दिसायची तिथून. येश्याने शेत दिल्यापासून एकदाही फिरकला नव्हता तिथे. एक वर्ष झालं असेल शेतावर जाऊन त्याला. जाणार तरी कसा आणि कश्याला जाणार. त्याची जमीन थोडीच होती ती आता. मग कधी कधी या दगडावर येऊन लांबूनच बघत बसायचा शेत… दुरूनच. निल्याला माहित होतं ते दुःख काय असते ते. येश्याला थोडयावेळाने कळलं, निल्या आला ते. 
" काय रे … कधी आलासं.",
" मी ना… ते शेताकडे बघत होतास तेव्हा आलो." त्यावर येश्या जरासं हसला. 
" का बघत असतोस रे … एवढं वाटतं तर जाऊन येना तिकडे. " ,
" नको यार… सवय सुटली आहे ती बरं आहे.… ती जागा आता आपली नाही ना. " निल्याने येश्याकडे पाहिलं, डोळ्याच्या कडा ओल्या वाटल्या त्याला. 
" छान चंद्र आहे ना आकाशात. मस्त उजेड पडला आहे… " येश्याने विषय बदलला. 
" अरे हो… तुला दुपारपासून शोधतो आहे मी. कूठे होतास… सकाळी तेवढा होतास नंतर कूठे गेलेलास… ", निल्याने विचारलं.
" पलीकडच्या वाडीतला शंकर माहित आहे तुला… ",
"कोण रे… ",
"तो रे… गेल्या महिन्यात त्याचा बैल मेला तो… ",
"हा हा … शंकर गुरव ना… ",
"हो… तोच, त्याने गळफास लावून घेतला ना… तिथे गेलो होतो. " निल्या काय बोलणार त्यावर. रोज, एक दिवस आड अशी बातमी यायची. " किती कर्ज केलं होतं त्याने. पाऊस नाही. त्यात बैल मेला. घरी खाणारी पाच डोकी. वैतागला होता अगदी. " मक्ख चेहऱ्याने येश्या सांगत होता. 
" तुला कोणी सांगितला, तो गेला ते. " ,
" अरे … माझा मित्र आहे त्या वाडीत. त्याच्या शेजारीच राहायचा. शंकराची जमीन पण त्याच्या शेताच्या बाजूलाच. एकत्र जायचे दोघे शेतावर. मित्र सांगत होता, रोज जाऊन बसायचा शेतावर. करपलेल्या जमिनीकडे बघत शिव्या देत बसायचा.देवाला शिव्या दयायचा,नशिबाला… घरच्यांना… कधी स्वतःलाच शिव्या दयायचा. आज पण एकत्र गेले दोघे शेतावर. मित्र, शेतातलं कुंपण तोडलं होतं गुरांनी. ते लावायला लांब गेला तेवढा. लांबून त्याला झाडावर काही हलताना दिसलं, त्याला वाटलं, वानरच आलं झाडावर. पण वानर कूठे येणार वडाच्या झाडावर. म्हणून धावत गेला तिथे. तर शंकर होता तो. पोहोचेपर्यंत, जीव गेला होता… काय करणार ना… देवाला पण दया येत नाही शेतकऱ्याची आजकाल. " निल्या फक्त ऐकत होता. त्याची परिस्थिती तीच होती ना, कर्जाचा डोंगर होता डोक्यावर. 

" चल… मी जेवून घेतो.… जाऊया ना उद्या शहरात… बाळाकडे… पत्ता वगैरे माहित आहे ना तुला." निल्या भानावर आला. 
" हो… पत्ता आहे, उद्या सकाळी निघूया. ",
"चल मग… " येश्या निघाला. निल्या दगडावर बसून." निल्या… चल. " येश्याने हाक मारली. 
" नाही तू जा… मी झोपतो आहे इथेच." येश्या निघून गेला. निल्याने गोधडी पसरली. अंग टाकलं त्याने खाली. वर आभाळात पसरलेल्या चांदण्याकडे बघत राहिला आणि विचारात गढून गेला. 

                  १२ वी पर्यंत शिक्षण झालं होतं. अजून पुढे शिकलो असतो तर शहरात चांगली नोकरी भेटली असती. पण वडिलांमुळे शेतात काम करायला लागलं. चांगली ५ एकर जमीन होती. वडिलांना अपघात झाल्यामुळे त्यांना शेतीची काम जमत नव्हती. निलेशला नाईलाजास्तोवर शेतीत उतरावं लागलं. त्यावेळी उत्पन्न बऱ्यापैकी असायचं शेतीतून. निलेश शेती करायला लागल्यापासून जरा चांगलं उत्पन्न यायला लागलं होतं. यशवंत सुद्धा शेती करायचा ना, दोघे एकमेकांना मदत करायचे. छान दिवस जात होते. शेत नुसतं डोलायचं वाऱ्यावर. हिरवं हिरवं गार… येश्या सुद्धा खुश असायचा. निलेशचा लहान भाऊ, रोहित… त्याच्या शिक्षणाचा सगळा खर्च, निल्याने शेतीतून केला. शहरात शिकावं अशी रोहितची इच्छ्या होती. आपण शिकलो नाही,पण बाळाला खूप शिकवावं असं निल्याने ठरवलं. शहरात निल्याचे नातेवाईक होते. तिथे त्याने रोहितची राहण्याची व्यवस्था केली, दरमहा ५००० रुपये दयायचा निल्या त्यांना, रोहितच भाडं म्हणून. रोहित सुद्धा हुशार होता, भावाच्या कष्टाचं चीज केलं त्याने. चांगले टक्के काढायचा प्रत्येक वेळेस. इकडे निल्या शेतात राबायचा आणि रोहित अभ्यासात.   


                शिक्षण पुढे वाढत गेलं तसा खर्चही वाढत गेला. त्यात पाऊससुद्धा कमी झाला होता एक-दोन वर्षात. एवढ उत्पन्न नाही आले होते शेतीतून. रोहितला engineering ला जायचे होते, तिथे होस्टेलची व्यवस्था होती. त्याचा खर्च होता. कसं करणार होता निल्या ते. खूप विचार करून त्याने २ एकर जमीन विकून टाकली. आणि मिळालेले सगळे पैसे रोहितच्या शिक्षणात खर्च केले. वडिलांबरोबर खूप मोठ्ठ भांडण झालं होतं तेव्हा निल्याचं. पण आपला बाळ नक्की मोठ्ठा होईल असं वाटायचं निल्याला. आणि तसंच झालं. रोहितने engineering चे शिक्षण पूर्ण केलं. किती आनंद झाला होता तेव्हा निल्याला. त्यादिवशी, रोहित पेढे घेऊन आला होता गावाच्या घरी, इतक्या वर्षांनी. बाळा आता मोठा झालेला. उंच, देखणा अगदी. आईला तर तोच आवडायचा पहिल्यापासून. त्याचेच लाड नेहमी. पण आता रोहित बदलला होता, शहरात राहून. गावच्या घरात त्याला जरा अवघडल्या सारखं वाटत होतं. निल्याला कळलं ते. २ दिवस तेवढा राहिला रोहित. तिसऱ्या दिवशी निघताना बोलला, 
"दादा… जरा बोलायचं होतं तुझ्याशी.",
"हा बाळा… बोल ना मग. " ,
"इकडे नको… चल, मी निघतो आहे आता. S.T. stand बोलू." निल्याला काही कळलं नाही. S.T. stand आले तसा त्याने लगेच विषय सुरु केला,
" दादा… आता मला गावात राहणं काही जमणार नाही. शहरात नोकरी मिळेल. गावात राहून काही होणार नाही.",
"मग… ",
"मग मला आता होस्टेलमध्ये राहता येणार नाही. मला एखादी रूम घेऊन देतोस का शहरात. ? ", निल्या चाट पडला. 
" बाळा… तू बघतोस ना… काय परिस्तिथी आहे इकडे. शेतात पिक उभं आहे, त्यातून किती पैसे मिळतील माहित नाही. त्यात बाबांना वरचेवर बर नसते. कूठून पैसे आणू सांग मी." रोहित रागावला. 
" मग…. एवढं का शिकलो मी.…. शेतात काम करण्यासाठी का.… ठीक आहे, करतो मी पण शेती." म्हणत त्याने हातातली सामान फेकून दिलं. 

               निल्याला वाईट वाटलं. सामान उचललं त्याने. धूळ झाडली." नको रे बाळा… असं नको बोलूस… एवढा शिकवला तुला ते काय गावात राहायला.… नाही ना, तुझा दादा आहे अजून… थोडे दिवस थांब, करतो काहीतरी व्यवस्था पैशाची.","ठीक आहे दादा." रोहितने किस्यामधून एक कागद बाहेर काढला." पैसे जमले ना कि या पत्त्यावर पाठवून दे. सध्या मी इथेच राहतो, भाड्यानी…. जेवढे जमतील तेवढे पाठवून दे. घर घेण्यासाठी एक रक्कम द्यावी लागते. बाकीच बँक लोन देते. ते काम मी करतो, फक्त अनामत रकमेचे बघ जरा." म्हणत रोहित निघून गेला. निल्या संभ्रमात, काय करायचे… खूप विचाराअंती त्याने आणखी उरलेल्या जमिनीचा तुकडा विकण्याचा निर्णय घेतला. १ एकर जमिनीत जास्त पैसे येत नव्हते. म्हणून २ एकर जमीन गेली. पुन्हा म्हातारा चिडला निल्यावर.५ एकर जमीन आता १ एकर वर आली. पण बाळाचं चांगलं होते आहे यावर निलेश समाधानी होता. जेवढी रक्कम आली, तेवढी त्याने रोहितला पाठवून दिली. त्यातून रोहितने एक छानशी रूम बूक केली. लवकरच चांगला जॉबही मिळाला. रोहीतच छान चालू होतं तिथे. कधी कधी निल्या तालुक्याला  जाऊन फोन करायचा रोहितला, त्याची खुशाली विचारायला. मोबाईल होता ना बाळाकडे. त्यावर निल्या फोन लावायचा त्याला. 


            रोहितच छान जमलं होतं शहरात. पण इकडे गावात दुष्काळ पडत होता. मोजकाच पाऊस व्हायचा. त्यात जी काही शेती व्हायची तेवढीच. त्यातून फारच कमी पैसे मिळायचे. तरी बर, नदी जवळ होती. तिथूनच शेतीला पाणी द्यायचा मग निल्या. तरीसुद्धा १ एकर जमिनीतून किती उत्पन्न मिळणार. वरून सुर्य आग ओकायाचा नुसता. पाणी जमिनीत मुरायच नाही. शेत कसं उभं रहाणार मग. रोहित सुरुवातीला दरमहिना थोडे पैसे पाठवून द्यायचा. हळूहळू ते २ महिने, ३ महिने असे पैसे येऊ लागले. आता आता तर सहा महिन्यांनी यायचे पैसे. ते पण जरासे. रोहितने लग्नही केलं होतं ना. फक्त निलेशला आमंत्रण होतं गावातून. निल्या काही गेला नाही लग्नाला. जाणार कसा… काय होतं द्यायला त्याच्याकडे. रोहित पैसे पाठवायचा त्यावर घर चालायचं कसं तरी. निल्या सुद्धा येश्याप्रमाणे गावात काही काम करत दिवस ढकलत होता. पाऊस झाला कि थोडी पेरणी करायचा. नाहीतर नदीच पाणी होतंच. 

            पण गेली तीन वर्ष पावसाचा एक थेंब पडला नाही जमिनीवर. शेतीवर पोट असणाऱ्याचे तर हाल झाले. किती शेतकऱ्यांनी कर्ज काढून काढून शेती केली होती. सगळी जळून गेली. नदी आटून गेली. शेतीला पाणी कूठून येणार … कर्जबाजारी शेतकरी आत्महत्या करू लागले. एकामागोमाग एक. घराचांचे हाल कसे बघवणार कोणाला. जणू देव रुसला होता माणसावर. तीन वर्षात एकदाही पाऊस नाही. एखादा काळा पुंजका यायचा डोक्यावर कधीतरी. त्यातून किती पाणी मिळणार… तरी लोकं आशेवर असायची. थोडातरी बरसेल म्हणून. तो काळा ढग आला तसा निघून जायचा. निल्याच्या वाडीपासून थोडया अंतरावर एक झरा होता. तिथून गावातल्या बायका पाणी भरून आणायच्या. तसा लांब होता तो. पण तिथून शेतीला पाणी आणू शकत नव्हतं. ते एक बरं, कि झरा आटला नाही. नाहीतर पिण्याच्या पाण्याची बोंब झाली असती. गावातले सगळेच एक-दोन दिवस आड आंघोळ करायचे. पाणी तसं होतं या गावात. बाजूच्या गावात ते पण नव्हतं. शहरातून tanker यायचा पाण्याचा, दोन दिवस आड. त्यावरून किती भांडण, मारामाऱ्या. एकाचा तर खून झाला होता, पाण्याच्या नंबरवरून. इतकं पाणी गडद झालं होतं. 


           निल्या अजून जागा होता. रात्र खूप झाली होती. त्या झाडाखाली शांत झोप लागायची. पण आज निल्या जागाच होता. अचानक त्याला हल्लीच , शेजारच्या गावातली घटना आठवली. पाण्याचा tanker यायचा, तो एका विहिरीत पाणी सोडायचा. रिकामीच विहीर ती. त्यात खाली माती असायची. पाणी जोराने पडायचं, सगळं पाणी गढूळ व्हायचं. पिणार कसं ते. तरी लोकं ते लाल, मातकट पाणी भरून भरून घेऊन जायचे. पुन्हा २ दिवसांनी tanker यायचा. मग लोकांनी कल्पना लढवली. हंडा किंवा कळशीला दोरी बांधलेली असायची. तर तसंच पाणी वरचे वर भरून घेयाचे. सगळे तसंच करू लागले मग. tanker ने पाईप विहिरीत सोडला कि सगळेच त्या पाईपच्या खाली हंडा,कळशी भरून घेऊ लागले. स्वच्छ पाणी मिळायचे, पिण्यासाठी. त्यादिवशी, tanker नेहमी सारखाच आला. सगळ्याची झुब्बड उडाली. पटापट सगळ्यांनी दोऱ्या लावलेली भांडी सोडली. एका आजीचा हंडा पहिलाच पाईपच्या खाली आला, जोरात पाण्याचा भपका आला पाईपमधून. म्हातारीला तोल सांभाळता आला नाही. थेट विहिरीत म्हातारी, डोक्यावर पडली. मोठी जखम डोक्याला. सगळी बोंबाबोंब. गाडीवाल्याला माहितच नाही म्हातारी पडली ते. त्याने पाणी चालूच ठेवलं. खूप वेळाने त्याने पाणी बंद केलं. तरुण पोरांनी पटपट उड्या मारल्या विहिरीत. म्हातारीला बाहेर काढलं. जीव होता अजून. लगेच घेऊन गेले तालुक्याला. लोकं हळहळली थोडी,… म्हातारीसाठी नाही तर… पाण्यासाठी. गढूळ पाणी तर वापरू शकत होते, या पाण्यात रक्ताचा लाल रंग होता. ते पाणी कोणीच वापरू शकत नव्हतं. दुसरी विहीर नाही जवळपास. उरलेला tanker मधलं पाणी किती जणांना पुरणार ना. होतं तेवढं पाणी देऊन tanker निघून गेला. काय ना… जिवापेक्षा पाणी महत्त्वाचं झालं होतं. 

            आतातर , ५ दिवस झाले तरी tanker यायचा नाही. गावातले बाप-माणूस मिळून जायचे दूरवर. तिथे नदी होती. नदी कसली …. लहानसा ओढा… मातकट पाणी, तेसुद्धा ५ मैल लांब. तेच पाणी भरून आणायचे मग. उन्हा-तानाची पायपीट. तालुक्यात तरी कूठे पाणी होतं,असलं तरी ते देणार का… शाळा बंद झाल्या. मुलंच नाही शाळेत तर कशी चालणार. सगळी मुलं सकाळपासून पाणी भरण्याच्या कामावर. शाळेत कोण कशाला जातेय मग. बायका तेवढया दिसायच्या गावात. पाण्याची गाडी आली तर कोणीतरी पाहिजे ना म्हणून. पहिली लहान पोरं जायची मोठ्या बरोबर पाण्याला. पण एक दिवशी, एक पोरगं… असेल ७-८ वर्षाचं. पाणी घेऊन येता येता चक्कर येऊन पडलं. किती उन्हं ते. दवाखान्यात नेता नेता वाटेतच जीव सोडला होता. म्हणून आता लहान मुलं जात नसायची. गावातचं रहायची. वाऱ्यासोबत धुरळा उडाला कि वाटायचं tanker आला, सगळी पोरं भांडी घेऊन धावत जायची. एकाद-दुसरा रिकामा tanker जायचा कधी कधी गावातून. त्यामागेही पळत जायची पोरं, रोज कोणना कोण ढोपरं फोडून घ्यायचे. माणसं वेडी झाली होती पाण्यामागे. जनावरं काय करणार मग… काही जणांनी विकून टाकली आपली. काहीजणांनी अशीच सोडून दिली होती वाऱ्यावर. कूठे कूठे जाऊन मारायची ती… हा वास यायचा गावात मग. त्यांना पुरायला कोण जाणार पुढे…. जमीन कठीण झाली होती उन्हाने. ती खोदायला कष्ट पडायचे खूप…. पुन्हा तहान लागणार, अंघोळ करावी लागणार… पाणी होतं कूठे एवढं… 

           निल्याच्या वाडीत तर पिण्यासाठी पाणी होतं.त्यावर चालायचं. पण आता त्याला खरंच गरज होती पैश्याची. म्हातारीच्या दोन्ही डोळ्यांना मोतीबिंदू झाला होता. म्हाताऱ्याच्या औषधांचा खर्च होता. त्यासाठी किमान २०,००० ची गरज होती. निल्या पुरता रिकामा झाला होता. त्यामुळे बाळाकडून थोडी मदत मागायला तो शहरात जात होता. रोहितने एव्हाना मोठ्ठ घर घेतलं होतं. लग्नानंतर तो तिथेच राहत होता. ५ वर्ष झाली असतील. तेव्हा निल्याला त्याने नवीन पत्ता दिला होता, काही गरज लागली तर. बाळा नक्की मदत करेल… असा सगळा विचार करत करत निल्याला कधी झोप लागली ते कळलचं नाही.                  

----------------------------------------------------- to be continued-----------------------




Saturday 10 October 2015

" सूड… ( भाग दुसरा ) "

          पुढचे चार दिवस तर inspector अभिषेकला "त्या" केसमध्ये लक्षच देता आले नाही. एका मंत्र्याच्या मुलाचे लग्न असल्याने त्याची डुटी तिथे लागली होती. तर महेशकडे दुसऱ्या केसेस होत्या. अभी वैतागला होता त्या लग्नाला. लग्न उरकल्यानंतर अभिने पुन्हा केसकडे देण्यास सुरुवात केली. त्यादिवशी महेशला त्याने घरी बोलावून घेतलं. 

" हा बोल अभि…कसं झाले लग्न.…. ", महेश जरा मस्करीत बोलला. 
" गप्प रे… ते नको आता ….किती त्रास झालं ४ दिवसात, विषय काढू नकोस तो." अभि वैतागत बोलला. 
" ok… बाबा, कशाला बोलावलंसं ? ", 
" अरे… कोमल सावंत केस कडे लक्षच दिलं नाही चार दिवस.", 
" हो रे… मी पण दुसऱ्या केसेस वर होतो ना.… पुण्याला गेलो होतो ना.",
" नवीन केस ? ",
" हो, तिथे एक बेवारस प्रेत सापडलं ",
"मग ते पुणे पोलिसांचा काम आहे ना… ",
" हा… पण माझा मित्र आहे ना pune forensic expert… त्याने मला बोलावून घेतलं, माझी केस नाही ती. " ,
" ठीक आहे ते जाऊ दे… आपल्या केस मध्ये काही आहे का ? ",
" तुझ्या एक गोष्ट लक्षात आली का?",
" कोणती ?",
" तू त्या सावंतला सांगितलं होतंस ना, मिडियामध्ये सांगायला… मग अजून मीडियात, news मध्ये काही आलंच नाही. पुन्हा ४ दिवसात त्याने call सुद्धा केला नाही." , अभिला पटलं ते. 
" मला वाटते त्यांनी मीडियात काही सांगितलंचं नसेल, कदाचित." ,
" may be… ठीक आहे, उद्या जाऊ त्यांच्या घरी. चल आता मी जातो माझ्या घरी. " म्हणत महेश घरी गेला. 

           सकाळीच त्या दोघांनी सावंतांचे घर गाठले, तर घरी फक्त मिसेस सावंत. अभिला जरा विचित्र वाटलं. " तुमची मुलगी गायब आहे ना.कोणालाच tension नाही का. " महेश मिस सावंतांना बोलला. " तसं नाही, पण ऑफिसला तर जावेच लागेल ना." महेश त्यावर काय बोलणार. " बरं… it's ok… मिस्टर सावंतांना मी हि गोष्ट मिडिया मध्ये कळवायला सांगितलं होते. मग अजून तशी news कशी नाही पेपर्स मध्ये. " त्यावर मिसेस सावंत गप्प झाल्या. अभि आणि महेश एकमेकांकडे पाहू लागले. काय समजायचे नक्की. इतक्यात राहुल आला. " Hi inspector …. काही समजलं का कोमलबद्दल ? ", एकदम tension free mind मध्ये होता राहुल. अभिच्या नजरेतून सुटलं नाही ते. " हा… ते शोधतो आम्ही. पण हि news अजून बाहेर कशी नाही. तुमचं लग्न म्हणजे मिडियासाठी मोठी event होती. आणि कोमल गायब आहे ते मिडियाला कसं माहित नाही अजून. " राहुल मिस सावंतकडे पाहू लागला. अभिला कळलं ते. " काय झालंय ? ", महेशने विचारलं. 

            राहुलने सगळी कहाणी सांगितली. मिडियामध्ये कोमल हरवली आहे हे सांगितलं तर बदनामी होईल. business shares वर परिणाम होईल. सगळीकडे गोष्ट पसरेल म्हणून काजलने सुचवलं कि कोमल काही दिवसांसाठी परदेशात गेली आहे असं सांगावं. आणि म्हणून मिडियामध्ये अशी काही गडबड नव्हती. अभिने डोक्याला हात लावला. काय माणसं आहेत हि… जवळच्या व्यक्तीपेक्ष्या business shares त्यांना जास्त महत्वाचे वाटतात. माणूसकी काय असते ते यांना माहित नसेल बहुदा.… अभि मनातल्या मनात बोलला. " Ok, then… मिस्टर सावंत आले कि मला भेटायला यायला सांगा." म्हणत दोघे बाहेर पडले.  

"काय यार… जरा विचित्र आहे. कोणालाच tension नाही. " अभि म्हणाला. 
" ऑफिस बरोबर आहे, बंद ठेवून चालत नाही.… तरीसुद्धा सावंत जरा विचित्र वागत आहे ना. सुरुवातीला काळजी वाटायची त्याला, आता काही नाही.… काय करायचे.",
"बघू… संध्याकाळी येतील ना ते. तेव्हा विचारू काय ते. ",
" चल, मी पुणेला चाललो आहे, तू भेट त्यांना. काय बोलले ते सांग.",
" पुण्याला कशाला …. ? ",
" अरे ती केस, बेवारस प्रेत… माझी केस नसली तरी, केस interesting आहे.",
"काय एवढं त्यात?", महेश खाली बसला सांगायला. 
" मी पुण्याला गेलेलो , काही काम होता म्हणून. तर माझा मित्र आहे ना… आनंद, तर त्याने मला बोलावलं होतं. एक प्रेत सापडलं होतं, अंगावर एकही कपडा नाही, त्याची ओळख कशी पटणार, चेहरा नीट होता म्हणून. परंतु तो पुण्यातला नाही हे स्पष्ट आहे. कारण त्या दिवसात कोणीच हरवल्याची तक्रार नाही. पूर्ण पुण्यातील पोलिस चौकीत त्याचा फोटो पाठवला होता. तरी त्याची काही ओळख नाही. शिवाय, काही दिवसा आधी एक गाडी देखील सापडली. तिचा नंबर सोलापूरचा आहे. कमाल आहे ना अगदी." 


" सोलापूर ? …. सोलापूरची गाडी पुण्याला… चोरून आणली असेल." ,
" असेल " महेश म्हणाला. 
" ठीक आहे, तू जाऊन ये पुण्याला." अभि म्हणाला. 
महेश निघाला आणि अभि पुन्हा " कोमल" च्या केस मध्ये डोकं घालू लागला. संध्याकाळी मिस्टर सावंत आणि काजल, पोलिस स्टेशनमध्ये आले. अभि त्यांचीच वाट बघत होता. 
" या… मिस्टर सावंत, खूप दिवसांनी आलात.",
"हो… जरा बिझी होतो ना ऑफिसच्या कामात. म्हणून जमलं नाही." , 
" आणि या काजल… या कूठे होत्या ?", अभि काजलकडे पाहत म्हणाला.
" मी… मी गोव्याच्या ऑफिसला होते." अभि संशयी नजरेने काजलकडे पाहू लागला. 
" तुम्हाला सांगितलं होता ना, केस संपेपर्यंत शहर सोडून जायचे नाही.",
" अहो… पण ऑफिसचं काम…. ",
"बर… बर, ठीक आहे." काजलच वाक्य मधेच तोडत अभी बोलला. 
" मी पण जरा दुसऱ्या कामात बिझी होतो, तर आता पुन्हा चौकशी सुरु करणार आहे.… ह्म्म्म… कोमल सावंत… ती हरवली नाही तर तिचे कोणीतरी अपहरण केलं आहे. हे तुम्हालाही कळलं असेल." दोघांनीही होकारार्थी मान हलवली.
" तर तुमचा कोणावर संशय आहे का ? किंवा तिचे कोणी शत्रू वगैरे…. कोणाबरोबर भांडण …आणि तुम्हाला कोणाचा फोन आलेला का… पैशांसाठी…", 
" नाही inspector … कोणताच फोन आला नाही…. तशी कोमल जरा short tempered होती. राग लवकर येतो तिला. हल्ली दोन भांडणे झाली तिची. " ,
" कोणाबरोबर… " ,
"एक ऑफिसमधला होता, दिपेश नावाचा. आणि दुसरा अमित, त्यांच्या ग्रुप मधला. दिपेशवर आम्ही केस केली होती. त्याला एक दिवस ठेवलं होतं पोलिस स्टेशनमध्ये. आणि अमित, तर असाच एकतर्फी प्रेम करायचा तिच्यावर, म्हणून भांडण झालं होते." अभिने दोघांचे पत्ते घेतले, सावंत आणि काजलला घरी जाण्यास सांगितले. 

          दिपेशचं घर जवळच होते, पहिला अभि तिथेच गेला. घराला कुलूप. शेजारी विचारपूस केली तेव्हा कळलं कि आई-वडिलांना दोन आठवड्याआधीच गावाला पाठवलं त्याने. शिवाय ५ दिवसापासून तोही गायब आहे. अभिला यात गडबड वाटली. त्याचा फोटो मिळवण्यासाठी तो ऑफिसमध्ये गेला. दिपेशची चौकशीही केली. सगळी माहिती गोळा करून तो आता अमितकडे निघाला.

" Hi, मी inspector अभिषेक… अमित इथेच राहतो ना. " अभिने दरवाजा उघडल्या उघडल्या प्रश्न विचारला. अमितची आई समोर होती.
" हो… अमित इथेच राहतो. any problem inspector ?," 
" मी आत येऊ का… जरा चौकशी करायची होती.",
" या आत…" अमितच्या आईने त्याला घरात घेतलं. 
" हा… बोला inspector, काय विचारायचे आहे. आणि कश्याबद्दल… " ,
" अमित आहे का घरात ?",
" नाही… तो मुंबईत नाही, पण तो कशाला हवा आहे तुम्हाला. " अभि त्यांच्याकडे बघत राहिला. 
" तुमची family आणि सावंतांची family…. खूप close relation मध्ये आहात ना… " अभिने त्यांना विचारलं. 
" हो… अमितचे वडील आणि मिस्टर सावंत हे business friends आहेत ना म्हणून, मिसेस सावंत, त्यांच्या मुली, मिस्टर सावंत… याचे जेणे-जाणे असते आमच्याकडे.",
"मग तुम्हाला कोमल बाबत माहित असेल, खर कारण… " ,
" हो कळलं मला, पण तुम्हाला अमित का हवा आहे.,",
" चौकशी…. अमितचं भांडण झालं होतं ना, कोमल बरोबर.…. एकतर्फी प्रेम… माहित आहे ना तुम्हाला. " ते ऐकून त्यांची मान खाली झुकली.
" त्यासाठी आलो आहे मी, अमित कूठे आहे आता ? ",
"अमित मुंबईत नसतो तेव्हापासून… सोलापूरला आमचे एक ऑफिस आहे, तिथे असतो तो.",
"म्हणजे मुंबईत येतंच नाही का कधी." ,
" येतो पण कधी कधी… " ,
" शेवटचा कधी आला होता ? ", 
" एक महिना झाला असेल. ",म्हणजे कोमल हरवण्याच्या खूप आधीपासून अमित मुंबईत नाही. शिवाय कोमल सोलापूर स्टेशनला दिसली होती. अमितचे ऑफिस सोलापूरला आहे. दोघांचा काही संबंध आहे का… " अमित call तर करत असेल ना… ",
"नाही…फोनसुद्धा करत नाही.",
" Last call कधी आला होता…. ",
" तेव्हाच… एक महिन्यापूर्वी…. सोलापूरला पोहोचला तेव्हा call केला होता. नंतर नाही. " अभि चक्रावून गेला.
" म्हणजे तुम्हाला काहीच वाटतं नाही, तो call करत नाही, इकडे नसतो त्याचं. " त्या गप्प झाल्या. थोड्यावेळाने बोलल्या. 
" तो आधीपासून असाच आहे. आमच्याबरोबर जास्त बोलत नाही तो. त्यात कोमलच प्रकरण झालं. अमित आधीपासून सोलापूरला जायचा. पण आठवड्याने मुंबईला यायचा. त्या भांडणानंतर तो मुंबईत नसतोच जवळपास…. आम्ही त्याला काही बोलत नाही, बिझनेसमध्ये लक्ष देतो तेच खूप आहे आमच्यासाठी." अभिने अमितचा फोटो घेतला, सोलापूरच्या ऑफिसचा पत्ता घेतला आणि तसाच घरी आला. 

              दोन दिवसांनी महेश मुंबईत परतला. थेट अभिषेकला भेटायला गेला." काय मग, inspector महेश, काय चाललंय ? " अभि जरा विचारात होता. महेशने ओळखलं,
" काय झालं रे ? ",
"काही नाही , जरा tension आले आहे या केसचे… ", 
" क्या हुआ ? ", अभिने सगळी जमलेली माहिती महेश समोर ठेवली. 
" हे बघ, कोमल हरवून म्हणजेच अपहरण होऊन एक आठवडा झाला आता. त्यांच्या घरी कोणालाच tension नाही. ते दोघे, बाप आणि त्याची पोरगी…. त्यांना सांगून सुद्धा मुंबई बाहेर गेले, ऑफिसच्या कामासाठी. तिथे अमित एका महिन्यापूर्वी सोलापूरला गेला आहे. तो काय करतो, याचं त्याच्या आई-वडिलांना काही नाही. राहुल तर विचारत सुद्धा नाही कोमलबाबत आणि कोमल……. ती कूठे आहे अजून त्याचा पत्ता नाही लागत अजून, डोकं फिरलं आहे माझं. " अभि डोक्याला हात लावून बसला होता. थोडयावेळाने तोच बोलला," तुझं सांग, काय झालं त्या केसचं…?",
" हा. ती केस ना, ती dead body भेटली होती ना, ओळख तर पटली नाही, पण त्याचा खून झालेला नक्की. गोळी लागली आहे त्याला. शिवाय एका महिन्यापूर्वीचे प्रेत आहे ते." ,
"म्हणजे कोणालाच कळले नाही एवढे दिवस.",
"अरे प्रेत जंगलात सापडलं… त्याच्या अंगावरचे कपडे कूठे गेले माहित नाही… चोराचे काम असेल कदाचित.",
"आणि ती कार भेटली होती ती. ",
"तिचे काही माहित नाही मला." तेव्हा अभिला काही आठवलं. 

"पाटील…. तुम्हाला काही काम सांगितलं होतं, केलंत का. ", अभिने आवाज दिला. 
" हो सर, त्यांना ११ वाजता बोलावलं आहे येतील इतक्यात.", महेश अभिकडे पाहू लागला,
" काय…?",
" कोमलचे bank statement चेक केला, दोन दिवसापूर्वीच तिच्या account मध्ये कोणीतरी ४००० जमा केले. आता ती तर ते account , use करत नाही किंवा तिची family सुद्धा नाही. म्हणून मी बँककडे चौकशी केली असता ते पैसे कोणीतरी बंगलोर मधून transfer केले आहेत.",
"Interesting !!!!! " ,
" तेव्हा पाटीलला सांगितलं होतं, तपास कर म्हणून." 
ते पैसे एका account मधून net banking ने direct transfer केले होते. त्यामुळे ज्या account मधून पैसे आले होते त्याची माहिती लगेच मिळाली. कोणी निलिमा नावाच्या स्त्रीचे ते account होते. त्यांना contact केला असता त्या बंगलोरला होत्या. तर त्यांना मुंबईत बोलावून घेतले अभिषेकने. 

बरोबर ११ वाजता मिस निलिमा आल्या ." Hello inspector, मी मिस निलिमा, sub inspector पाटील यांनी, तुम्ही भेटायला बोलावलं असं सांगितलं. म्हणून आले आहे मी.",
" हो… हो, please seat. " अभिने प्रथम साधी चौकशी सुरु केली. " तुम्ही मराठी छान बोलता, बंगलोरच्या वाटत नाही तुम्ही." , 
" मी मुंबईला राहते, बंगलोरला माझी आजी असते.",
"अस आहे तर…. बर मग, तुमची आणि कोमलची ओळख कशी ? ", direct प्रश्न… 
"कोमल कोण ? ",
"कोमल सावंत, तुम्ही ओळखता ना तिला… ", निलिमाने " नाही" म्हणून मान हलवली. 
" तुम्ही ओळखत नाही, मग तिच्या account मध्ये तुम्ही पैसे कसे deposit केले ? ", निलिमाच्या चेहऱ्यावर मोठ्ठ प्रश्नचिन्ह. सरते शेवटी, अभिने कोमलचं bank statement दाखवलं. आणि तेव्हा नीलिमाला click झालं. 

" या होय… ओळखलं मी…. हो मीच ४००० deposit केले.",
"प्रथम तर ओळखलं नाही तुम्ही कोमलला." ,
" हो, मी ओळखलंचं  नाही तिला.",
"नक्की काय म्हणायचे आहे तुम्हाला. कोमल तुमच्या ओळखीची नाही,तरी तिच्या account मध्ये ४००० जमा केलेत, पैसे जास्त झालेत का ?",
"तसं नाही काही, तिने मला मदत केली होती म्हणून. ",
" जरा सविस्तर सांगा.आणि पाटील यांचे statement लिहून घ्या.… हम्म, बोला आता. " ,
"त्या दिवशी, माझी आजी खूप आजारी होती. त्यामुळे मला urgent जायचे होते तिला भेटायला. ऐनवेळी विमानाचे तिकीट मिळत नाही. तरी मी try केलं खूप. emergency ticket सुद्धा नव्हती. खूप विनवण्या केल्या मी, ticket counter वर. त्यांनी ऐकलाच नाही. त्यावेळेस कोमल माझ्या मागे उभी होती. तिने विचारलं मला, मी सांगितलं तसा तिने तिचे तिकीट मला दिले. तिच्या तिकिटावर मी बंगलोरला गेले. जाताना मी तिचा bank account number घेतला होता. तिकिटाचे पैसे परत देण्यासाठी." अभिने सगळं ऐकून घेतलं. म्हणजे कोमल बंगलोरला गेलीच नाही. तिच्या ऐवजी निलिमा गेली. त्यामुळे बंगलोर विमानतळाच्या passenger list मध्ये कोमलचच नाव आहे. एका ठिकाणाचा सुगावा तर लागला. तरी दोन ठिकाण बाकी आहेत अजून, अभि मनातल्या मनात विचार करत होता. 
" ठीक आहे. मिस निलिमा , thanks, तुम्ही आल्याबद्दल. तुमचा फोन नंबर आणि पत्ताही देऊन जा जाताना… " 

             संध्याकाळी महेश आला. त्यांला अभिने सगळी माहिती दिली. " याचा अर्थ, कि कोमल definitely सोलापूरला गेली होती. आणि त्या रेल्वे पोलिसांच्या बोलण्यानुसार, ती तक्रार नोंदवून बंगलोरच्या दिशेने निघाली होती." महेश म्हणाला. 
" तरी गोव्याची mystery तशीच आहे अजून." अभि बोलला. 
" सुटेल रे ती पण हळूहळू.…. बरं , दिपेशचा काही पत्ता…. ",
"हो, लागेल पत्ता त्याचा. mobile track करायला सांगितला आहे , दोघांचा.… दिपेश आणि अमितचा. " ,
"अमित तर सोलापूरला आहे ना, मग त्याचा का. ",
" असंच , त्याच्यावर सुद्धा संशय आहे ना माझा. एका महिन्यापूर्वी त्याने त्याच्या घरी contact केला होता, त्या नंतर एकदाही मुंबईत आला नाही किंवा call केला नाही." ,
"interesting आहे ना अमित, बघू त्याचा फोटो, कसा दिसतो ते… " अमितचा फोटो पाहिल्यावर महेश उडालाच. " अरे… अभि, पुण्यात याचीच तर dead body सापडली आहे." ,
" काय… ? तू शुद्धीवर आहेस ना महेश." अभि म्हणाला. 
" हो रे, definitely हाच आहे तो. थांब. " म्हणत महेश त्याची bag आणायला गेला. Bag मधून त्याने पुण्याच्या केसचे पेपर्स आणि फोटोस काढले. अभिने ते फोटो लगेच ओळखले, अमित होता तो. अमितचा खून झाला आहे… या विचाराने अभिचे डोके चक्रावून गेले. 

" हा नक्की अमित आहे आणि तू म्हणतोस, एका महिन्यापूर्वी त्याचा खून झाला आहे. म्हणजे अमित मुंबईहून सोलापूर गेला तेव्हाच त्याचा खून झाला आणि त्यामुळेच अमित महिनाभर मुंबईत आला नाही कि call केला नाही. शिवाय त्याच्या घरीसुद्धा माहित नाही." अभि म्हणाला.
" त्याच्या घरी कळवूया का आता. ? " महेश.
" कळवायला तर हवे. पण एक गोष्ट कळत नाही, त्याची आई तर बोलली कि तो सोलापूरला गेला, मग… त्याची dead body पुण्यात कशी. ?" दोघांनाही प्रश्न पडला. अजून काही माहिती गोळा करून अभिने, अमितच्या घरी कळवलं. दुःखाचा डोंगर कोसळला त्यांच्यावर. एवढया मोठ्या मुलाचा खून झाला, यावर त्यांचा विश्वास बसत नव्हता. पुण्याला जाऊन त्यांनी मृतदेहाची ओळख पटवली. अमितच होता तो. खरंच खूप वाईट झालं होतं. एव्हाना मिडियामध्ये हि news पसरली होती. 

" एक केस होती, त्यात आता दुसरी केस सुरु झाली." अभि वैतागून म्हणाला.
" पण तो पुण्याला गेला का… काहीच कळत नाही. बरं , त्याच्या शरीरातून जी गोळी काढली, त्याची काही माहिती, ज्या गनमधून गोळी झाडली ती गन भेटली का ?",
" नाही. त्याबाबत काही माहिती नाही. पण मला वाटते ती गाडी भेटली ना , तिचा काही संबंध असेल का… कारण ती गाडी सोलापूर मधली आहे. आणि अमितचं ऑफिस सोलापूरला आहे… बरोबर ना." ,
" yes… नक्कीच ती अमितची गाडी असेल. मला वाटते आपण पुण्यात चौकशी करू. कोणीतरी पाहिली असेलच ती कार… तिथून मग सोलापूरला जाऊ, चालेल ना." म्हणत अभिने पुण्याला जायची तयारी केली. पुण्यात पोहोचून त्यांना तशी काही माहिती नाही मिळाली, परंतू सोलापूरला चौकशी केली तेव्हा वेगळीच माहिती समोर आली. 

" मला वाटते, मिसेस सावंतांना इकडेच बोलावून घेऊ. "महेशने विचार मांडला.
" नको… मुंबईत भेटू त्यांना." अभिने मुंबईत आल्या आल्या मिस्टर आणि मिसेस सावंत यांना बोलावून घेतले. 
" Hello inspector, काही माहिती मिळाली का , कोमलची. ",
" नाही, actually… मी मिसेस सावंतांना बोलावले होते, पण तुम्हाला सुद्धा कळावे म्हणून बोलावलं. " तेवढयात महेशसुद्धा आला 
" Direct विचारतो, अमितचा खून झाला हे माहित आहे ना तुम्हाला. ",
"हो… ",
" त्याचा खून एक महिन्यापूर्वी झाला, हे सुद्धा माहित असेल मग.",
" हो inspector ",
"मग ज्या दिवशी खून झाला, त्यादिवशी तुम्ही अमितला भेटायला का गेला होतात…. मिसेस सावंत… " या प्रश्नावर मिसेस सावंत अभिकडे पाहू लागल्या आणि मिस्टर सावंत त्यांच्याकडे.
" Inspector, तुमचा काहीतरी गैरसमज होतो आहे, मी कधी गेलीच नाही सोलापूरला. " मिसेस सावंत अडखळत बोलल्या. अभि त्यांच्याकडे शांतपणे पाहत होता. 
" पण मी, तुम्ही सोलापूरला गेला होतात असं कूठे म्हणालो.… बरोबर ना मिसेस सावंत." आता त्यांच्याकडे काहीच नव्हते बोलण्यासारखं, त्या गप्प बसून राहिल्या.
 "बोला मिसेस सावंत, अमित त्याच्या ऑफिसमधून ज्या दिवशी शेवटचा गेला होता, त्या दिवशी तुम्हीच त्याच्या ऑफिसमध्ये गेला होतात ना, तुमचा फोटो ओळखला तिथल्या कर्मचाऱ्यांनी. शिवाय अमितच्या mobile वर शेवटाचा call तुमचाचं होता… कारण त्या दिवसानंतर अमितचा मोबाईल बंद आहे. म्हणजेच तुम्हीच त्याला भेटलेल्या शेवटच्या व्यक्ती आहात. तुम्ही खून केलात अमितचा… ",
" नाही. " इतका वेळ शांत असलेल्या मिसेस सावंत ओरडल्या. " मी नाही मारलं अमितला…. आणि मला माहित नाही कोणी मारलं ते. " 

मिस्टर सावंत तर नुसतेच ऐकत होते." तर मग तुम्ही त्याला का भेटायला गेला होता ? " ,
"कोमल विषयी बोलायला. ",
" पूर्ण गोष्ट सांगा. ",
"अमितचे प्रेम होते कोमलवर. पण कोमलचं लग्न ठरलं होतं. अमितला ते मान्य नव्हतं. शिवाय त्याचा राग होता दोघांवर, कोमल आणि राहुलवर. तो ते लग्न होऊ देणार नव्हता.हे त्याने मला सांगितलं होते एकदा. म्हणून तो letter's पाठवायचा अमित.",
"म्हणजे…तुला माहित होतं, अमित letter's पाठवायचा ते. " मिस्टर सावंत. 
" हो…. मी पाहिलं होतं एकदा अमितला तसं करताना, तसं त्याला मी सांगितलंही, कि हे बंद कर… पण तो ऐकायला तयार नव्हता.",
"म्हणून तुम्ही त्याचा खून केलात." महेश बोलला. 
"नाही … मी नाही खून केला त्याचा. जेव्हा त्याने मला फोन करून बोलावलं तेव्हा मी त्याला भेटायला गेले. त्याला काहीतरी सांगायचे होते मला म्हणून. ",
"काय सांगायचे होते.? ",
"माहित नाही. त्या दिवसा आधी, दोन दिवस आधी मला त्याचा फोन आला होता कि मला कोमल बद्दल काही माहिती मिळाली आहे, मला सोलापूरला भेटायला या. नाहीतर मी मिडियामध्ये "ती" बातमी देईन. असं म्हणाला तो. त्यासाठी मी त्याला भेटायला गेली होती. ",
"किती वाजता? ",
" सकाळी ११ वाजता. त्याला भेटले होते मी." ,
" आणि काय बोलणे झाले तुमचे.",
"जास्त नाही बोलला तो. काही सांगणार होता. पण एक urgent मीटिंग ठरली त्याची तसा तो निघून गेला. मुंबईत आलो कि बोलू असा म्हणाला. दोन दिवसांनी येणार होता तो मुंबईत. आलाच नाही. आणि आता ही news आली." अभिने सगळे ऐकून घेतलं. त्यांचे सगळे बोलणे रेकॉर्ड करून घेतलं महेशने. 

ते दोघे घरी गेले आणि इकडे अभि , महेशची चर्चा सुरु झाली. " मला वाटते , या सगळ्या Family मध्ये गडबड आहे, काजल सोडली तर.… ",
"तिला का सोडायचं… ",
"तिचं जरा बरी वाटते यांच्यात. कोणामध्ये कधी नसतेच ती. ",
" असो, आता काय",
"या सगळ्यावर आपल्याला आता नजर ठेवावी लागेल. कारण अमितला नक्कीच काहीतरी माहित होते,म्हणून त्याचा खून झाला." अभि . 
" तसं असेलही. पण मिसेस सावंतानी खून केला असा अर्थ होतं नाही ना." महेश बोलला. 
" एक गोष्ट मिस केलीस अभि, मिसेस सावंत सांगत होत्या, ते letter अमित पाठवायचा. अमितचा एक महिन्यापूर्वी खून झाला, कोमल kidnap होऊन २ आठवडे झाले.मधल्या २ आठवडयातसुद्धा कोमलला तशी अजून ३ letter's आली. जर अमितचा खून झाला होता तर नंतरची ३ letters कोणी पाठवली." अभिच्या लक्षात आली ती गोष्ट.
" means… ती पत्र कोणी वेगळीच व्यक्ती पाठवायची… असंच म्हणायचे आहे ना तुला." महेशने होकारार्थी मान हलवली. अभि विचार करू लागला. 
" मला वाटते, या सगळ्याची history काढावी लागेल. " मिस्टर सावंत मोठे businessman होते, त्यांची सगळी माहिती काढणे सोप्पे होते. अभिने काही जणांची टीम बनवली आणि ज्यांच्यावर संशय होता त्या सर्वांची माहिती गोळा करायला सांगितली. तो स्वतः बंगलोर ऑफिसला गेला. 

            अजून काही दिवस गेले, अभिने बरीच माहिती गोळा केली होती. पुढच्या चौकशीसाठी त्याने काजलला बोलावून घेतलं. काजल तशी उशीरच आली. 
" या बसा… ","Sorry हा… जरा उशीर झाला.",
"तुम्ही सगळीकडे वेळेच्या आधी पोहोचता ना, असं ऐकलं आहे मी." त्यावर काजल आश्चर्यचकित झाली. 
" means ? काय म्हणायचे आहे तुम्हाला… ",
"नाही… तुम्ही ऑफिसमध्ये किंवा कूठे मिटिंग असेल तर १० - १५ मिनिटे आधी पोहोचता ना म्हणून बोललो." त्यावर काजल जरा relax झाली. 
" तसं होय.…. हो, मला सवय आहे लवकर जायची… बरं, तुम्ही कशाला बोलावलं ? ",
"हा… कोमल बद्दल विचारपूस करायची होती. ",
"काय विचारायचे होते?",
"कोमल बरोबर शेवटचं बोलणं झालं तेव्हा ती काही बोलली होती का तुम्हाला…. I mean, कोणी त्रास देते आहे वैगरे असा काही… ". काजल विचार करू लागली. खूप वेळाने बोलली ती." तसं काही बोलली नाही ती." अभिसुद्धा विचार करत होता. 
" मग तुम्हाला काय वाटते मिस काजल…. कोण असेल या kidnap च्या मागे.? ",
" ते मी कसं सांगू… ती तशी बिनधास्त रहायची नेहमी. कदाचित ट्रेनमध्ये कोणी तिच्या सामानावर नजर ठेवून हे सगळं केलं असेल. फक्त ती सुखरूप असू दे.",
"हं… thanks… मिस काजल. आम्ही कळवू काही सापडलं तर… तुम्ही येऊ शकता आता. " काजल निघून गेली. 

             आणखी ३ दिवस गेले. खूप काही माहिती मिळाली होती. खूप गोष्टी समोर आल्या. महेश सांगत होता ते अगदी बरोबर होते. मिस्टर सावंत यांच्यावर बंगलोरला केस चालू होती. परंतु त्यात त्यांच्या business partner ला पुराव्या अभावी सोडण्यात आलं होते. आणि तो business partner होता, राहुल.… होय, कोमलचा होणारा नवरा , राहुल…. त्याच्या विरोधात काही सापडलं नाही.पण त्याचा business पार बुडाला. इकडे दिपेशच्या mobile ची लास्ट लोकेशन गोवा हीच होती. साहजिकच त्याने नंबर बदलला असण्याची शक्यता होती. त्याचा तपास सुरु होता. आता गोवा ऑफिसला जाऊन काही मिळते का ते बघू म्हणून अभि, महेश सोबत गोवाला गेला. काजलच्या flat वर पोहोचले, काजल अर्थात मुंबईला होती. flat एकदम शानदार होता. एका व्यक्तीसाठी तो खूपच मोठा होता. तिथे त्यांनी तपास सुरु केला. घरात २ गाड्या. 
" काजल madam इकडे एकटीच राहते ना." त्यांनी तिथे कामावर असलेल्या नोकराला विचारले. 
"हो साहेब, एकट्याच राहतात madam……. आणि कधी कधी त्यांचे एक मित्र येऊन राहतात." त्यावर अभिची नजर चमकली. 
" मित्र…. कोण ? ",
"अमित सर येऊन राहतात कधी कधी. ",
"अमित ? ", महेशने लगेच त्याला अमितचा फोटो दाखवला. 
" हेच का अमित सर …. " त्याने फोटो ओळखला. " हो… हेच येतात कधी कधी.",
"अजून कोण कोण येते इथे… ? " नोकर जरा गोंधळला. त्यावर ,महेशने bag मधून काही फोटो काढून दाखवले. त्यातले आणखी काही फोटो त्याने ओळखले. 


              अभि आणि महेशला खूप महत्त्वाची माहिती त्या नोकराने दिली. केस जवळपास solve होत होती. आता दिपेश हाती लागणं गरजेचे होते. दोघे बोलत बोलत flat च्या बाहेर आले. महेशची नजर तिथे उभ्या असलेल्या कारवर गेली. दोन कार… ह्म्म्म……. महेश काहीतरी विचार करू लागला." Watchman !! " महेशने हाक मारली. 
" जी साहेब. ",
"काजल madamच्या गाडया आहेत ना दोन्ही. ",
"हो… त्यांच्याच आहेत, त्याचं वापरतात." ,
"आणि driver असेल ना… तो कूठे आहे आता. ",
" Driver होता साहेब… काजल madam बरोबर भांडण झाला म्हणून त्याला काढून टाकलं. ",
"ok… किती दिवस झाले ? ",
"दिवस नाही… ३ महिने झाले." अभि ते ऐकत होता. महेशने अभिकडे पाहिलं. महेशला काय म्हणायचे आहे ते कळलं अभिला. अजून काही विचारपूस करून दोघे निघाले. गोव्यालाच सावंतांचे कोणीतरी नातेवाईक राहतात अशी माहिती अभिकडे होती. त्यांना भेटायला ते गेले. 

" नमस्कार…. मी inspector अभिषेक आणि हा माझा मित्र Doctor महेश…. मी तुम्हाला call केलेला भेटण्यासाठी… ",
"हो… हो, आठवलं… या inspector, आत या." म्हणत आजींनी दोघांना घरात घेतलं. 
" काही माहिती हवी होती, सावंत कुटुंबाबद्दल.… तुम्हाला तर माहित असेल ना सध्या काय चालू आहे ते… कोमल बद्दल. " त्यावर आजी काही बोलल्या नाहीत. 
"तुमचं आणि त्यांचं काय नाते आहे, actually.",
" काजलची आजी आहे मी. सुगंधा ( मिसेस सावंत ) माझी मुलगी. ",
"ओहह… असं आहे तर. पण तुम्ही गोव्याच्या आणि सावंत मुंबईचे. मग ओळख कशी ? ",
" सावंत हे मूळचे गोव्याचेचं. नंतर त्यांनी आपले सगळे मुंबईला हलवलं. आणि तिथे स्थायिक झाले." अभि आणि आजी गप्पा मारत होते, तर महेश सगळ्या घरात नजर फिरवत होता. घर तसं नेटकं होतं. एका कोपऱ्यात काही फोटोज होते. महेश ते पाहण्यासाठी म्हणून गेला. १०-१२ फोटो होते. 

थोडयावेळाने आजीही आल्या फोटो बघायला. " हे फोटोज… ?", महेशने प्रश्न विचारला. 
" काजलचा जन्म इकडचा… गोव्याचा. ती इथेच होती, दीड वर्षाची होईपर्यंत. " आजी खूप आनंदाने सांगत होत्या. महेशला प्रश्न पडला. 
" आजी… कोमल मोठी कि काजल… ? ",
"कोमल मोठी. ",
"मग तिच्या मित्रांनी सांगितलं कि ती काजलला ताई म्हणून हाक मारायची.".
"ती अशीच… मस्करी करायची. कोमल मोठी आहे ४ महिन्यांनी.",
" ४ वर्षांनी म्हणायचे आहे का तुम्हाला ?",
"नाही, ४ महिने. "…. ४ महिने….  कसं शक्य आहे…. अभि, महेश कडे पाहू लागला. महेशच बोलला मग,
" ठीक आहे आजी. ४ महिने ना ठीक आहे. तरी सुद्धा या सगळ्या फोटोजमध्ये फक्त एकचं लहान मुल आहे.",
" काजल आहे ती. " आजी बोलल्या.
" शिवाय, मघाशी तुम्ही स्वतःची ओळख करताना "काजलची आजी" असं म्हणालात. मग मला सांगा , कोमल का नाही या फोटो मध्ये ? ",
" कारण कोमल माझी नात नाही, काजलचं आहे. " कहानी में twist. 
" मग कोमल….  कोण आहे ? ",
"माहित नाही… सुगंधा(मिसेस सावंत ) एकदा कोमलला घेऊन आली अचानक, म्हणाली रस्त्यावर कोणीतरी सोडून दिले होते. तेव्हा कोमल असेल दीड वर्षाची. ",
"मग तुम्हाला कसं माहित. कि ती ४ महिन्यांनी मोठी आहे ते.",
"सुगंधाने सांगितलं. कोमल जशी आली , त्यानंतर ३-४ दिवसातच ते मुंबईला गेले,ते आजपर्यंत. त्यानंतर सुगंधा एकदाही आली नाही मला भेटायला गोव्याला. मीच जायचे कधी कधी मुंबईत. आता वय झालं तर जमत नाही प्रवास. फोनवरचं बोलणं होते. काजल येते कधी कधी, कोमल एकदाही आली नाही.म्हणून मला कोमल आवडत नाही, काजलचं नात माझी." अभि आणि महेश निघाले. बाहेर जाऊन चहा घेतला दोघांनी. 
" मला वाटते , अजून काही दिवस जर थांबलो ना इथे तर खूप काही मिळेल मला. तू जा मुंबईला. " आणि महेश मुंबईला आला. 

       पुढच्या दोन दिवसात दिपेशला सापळा लावून पकडण्यात आले. त्याकडून खूप मोठी माहिती मिळाली. महेश तर आधीच मुंबईला आला होता, केस संपल्यात जमा होती. सगळी माहिती गोळा करून अभि , दिपेश आणि त्याची टीम मुंबईला पोहोचले. आल्या आल्या महेशने अभिवर प्रश्नाचा भडीमार केला. 
" अरे… थांब थांब… किती प्रश्न… ",
"अरे साल्या… किती उस्तुकता लागून राहिली आहे मला… आणि कोमल भेटली का…. कोणी kidnap केलं तिला, दिपेशने ना…. कि कोणी दुसरा होता… ", अभिने हातानेच महेशला "थांब" अशी खुण केली. आणि मिस्टर सावंत यांना call केला. 
" Hello… मिस्टर सावंत… मला भेटायचे आहे तुम्हाला… ",
" कोमल भेटली का तुम्हाला ? ",
"भेटेल पण तुम्हाला भेटायचे आहे… ",
" कधी येऊ मी पोलिस स्टेशनमध्ये… ",
" नको… मी येतो तुमच्या घरी… मी काही नावे सांगतो, त्यांनाही उद्या बोलावून घ्या. काही प्रश्नांची उत्तरे अजून नाही मिळाली. ती जाणून घ्यायची आहे. ok… मग उद्या भेटू." 

         ठरल्याप्रमाणे, अभिने ज्यांना ज्यांना बोलावलं होते, ते सगळे हजर होते. अभि बरोबर बरेचशे police sub inspector, ladies constable आल्या होत्या. 
" हे सगळे कशाला आले आहेत inspector ? ",
"यांची गरज लागू शकते कदाचित म्हणून… " तसे जमलेले सगळे उभे राहिले. अभिला जरा हसू आलं. हसू आवरत त्याने सगळ्यांना बसायला सांगितले. सगळेच घाबरले होते. अभिने सगळ्यावर एकदा नजर फिरवली. अभिने बोलायला सुरुवात केली. 
" OK, इकडे जमलेले सगळे , हे business field मधील मोठी नावं आहेत, corporate मध्ये सगळेच फ़ेमस आहेत.…. " सगळ्यांनी ते मान्य केलं,"तर जेव्हा मी कोमलच्या केस मध्ये गुंतलो होतो तेव्हा खूप गोष्टी समोर आल्या, त्यातल्या काही गोष्टी अजून सुटल्या नाहीत माझ्याकडून, म्हणून तुम्हा सगळ्यांना बोलावलं आहे. " आता सगळे एकमेकांकडे पाहू लागले. 

       " पहिले सगळे relax व्हा, मग मी सुरु करतो. " अभिने पुन्हा सगळ्याकडे एक नजर फिरवली. " ok, पहिला प्रश्न विचारतो… आणि खरी उत्तरे मी अपेक्षित करतो. कारण मी खूप माहिती मिळवली आहे. फक्त ती तुमच्याकडून आली तर जास्त बरं होईल." अभिने त्याच्या हातातली काही कागदपत्र तिथे असलेल्या टेबलावर ठेवली. " या एका केसमुळे खूप धावपळ झाली, आम्हा सगळ्यांचीचं… जणू काही आमच्यामध्येच स्पर्धा लागली होती. धावण्याची…. " अभि हसत म्हणाला. " चला… आता आपण सुद्धा एक खेळ खेळूया." सगळे अभिकडे पाहू लागले. 
" Inspector…. तुम्ही इथे कशाला बोलावलं आहे आम्हाला ? काय असेल ते स्पष्ट सांगा. खेळ वैगरे काय …. What is this… ? ", अमितचे वडील रागात म्हणाले. 
"शांत व्हा… मिस्टर पंडित… शांत व्हा." अभि बोलला. " तर सगळे तयार आहात का… चला सुरु करू खेळ. " अभि त्या टेबलापाशी आला. " हे पेपर्स आहेत ना… ते साधे पेपर्स नाही आहेत. इथे जमलेल्या काही लोकांचे arrest warrant आहेत… " ते ऐकून सगळेच अवाक झाले. " arrest warrant… ?" काजल बोलली.
 " हो… मिस काजल…. इकडे असलेल्या काही लोकांनी , कधी ना कधी, कोणता ना कोणता crime केला आहे. पण त्या वेळेस काही भ्रष्ट पोलिस अधिकाऱ्यांमुळे त्या केसेस तश्याच राहिल्या किंवा पुढे गेल्याच नाहीत. त्या केसेस मी पुन्हा open केल्या. आणि आता त्यांची arrest warrant आणली आहेत, संपूर्ण माहिती सहित." अभिने काजलकडे पाहिलं. 
" मिस काजल, तुम्हीच पहिलं arrest warrant कोणाचे आहे ते बघा. नावं मोठयाने वाचा प्लीज…" काजलने पुढे होईन एक पेपर उचलला. नाव बघून चेहरा पांढरा पडला. 
" आई… तुझं नाव आहे. " मिसेस सावंत लगबगीने पुढे आल्या आणि त्यांनी पेपर्स बघितले. त्यांचं नाव होते… 
" मी… मी काय केलं आहे… मला का अटक… ? " 

अभिने त्यांना इशारा करून खुर्चीवर बसायला सांगितला.
" बसा… पहिला नंबर तुमचाच लागला, बरं झालं.",
" पण मी काय केले आहे.?" अभि त्यांच्या समोर येऊन बसला. 
" तुम्हाला २६ वर्षापूर्वीची गोष्ट आठवते का… तुमची कार… रात्र… अपघात….आठवलं का काही… " ते ऐकून मिसेस सावंत चलबिचल झाल्या. काही न बोलता त्या असंच कूठे तरी पाहू लागल्या. 
" ठीक आहे… कोमल तुमची मुलगी नाही ना… कूठे सापडली ती तुम्हाला… ?",
"रस्त्यात कोणीतरी सोडून दिलं होतं तिला.",
"हम्म… मग तुम्हाला कसं माहित कि ती ४ महिन्यांनी मोठी आहे, काजलपेक्षा… " पुन्हा चलबिचल…,पुन्हा गप्प. 
" रस्त्यावर सापडलेली तर तिचं birth certificate कसं… बोला मिसेस सावंत, मी सुरुवातीला सांगितलं कि माझ्याकडे पुरावे सुद्धा आहेत. आता गप्प बसून काही होणार नाही. बोला." ladies constable त्यांच्या शेजारी येऊन उभ्या राहिल्या. मिसेस सावंत रडू लागल्या. थोडयावेळाने रडू आवरून त्यांनी सांगायला सुरुवात केली.
"काजल तेव्हा १ वर्षाची होती. मी माझ्या आईकडे गोव्याला होते. काजलला आईकडे ठेवून मी जरा पाय मोकळे करायला बाहेर जायचे. त्यादिवशी असचं झालं, माझ्या मैत्रिणीकडे पार्टी होती. तिथून मी घरी परत येत असताना accident झाला होता. ",
"पण तू तर किती हळू चालवते कार आणि व्यवस्थित चालवतेस, तरीसुद्धा accident…. " मिस्टर सावंत मधेच बोलले. 
"Drink and Drive ची केस आहे मिस्टर सावंत… "अभिने माहिती पुरवली. काजल आता shock मध्ये होती. 
" तू ड्रिंक पण करतेस…. " मिसेस सावंत मान खाली करून बसल्या होत्या. 
" तेव्हा मी करायचे ड्रिंक… त्यादिवशी काजल एक वर्षाची झाली होती म्हणून मैत्रिणीनी जरा जास्त ड्रिंक दिलं मला. आणि रात्री घरी येताना, कंट्रोल गेला कारवरचा…. समोरून एक जोडपं जात होतं, त्यांना…. " आणि मिसेस सावंत थांबल्या बोलायच्या. 

सगळेच त्यांच्याकडे पाहत होते. अशीच घटना होती ती. " पण हि माहिती तुला कशी भेटली ? " महेशने विचारले. 
" तुला बोललो होतो ना, आणखी काही दिवस थांबलो तर खूप माहिती मिळेल. तू मुंबईला गेलास तेव्हा परत मी आजींकडे गेलो होतो. तिथेच मला कोमल आणि काजलची birth certificate मिळाली. त्यावरून मी कोमल ज्या हॉस्पिटल जन्माला आली तिथे गेलो. तिथे यांची माहिती मिळाली. यांनी कोमलला adopt केलं तेही तिथून कळलं. … मिसेस सावंत, अजून काही सांगता का… ? " त्यांनी बोलायला सुरुवात केली. 
" ते दोघेही खूप जखमी झाले होते. त्यांना तसंच गाडीत घेतलं आणि मीच admit केले. ते मिस्टर तेव्हाचं गेले होते. पण त्या बाई होत्या… त्यात कळलं कि त्या pregnant आहेत. लगेच operation केलं, मुलगी झाली होती पण त्या बाई वाचू शकल्या नाहीत. त्या मुलीला तसंच मग हॉस्पिटलमध्ये ठेवलं होतं. माझ्यावर केस झाली….  Drink and Drive ची …. मनुष्य वधाची. कोमलला नंतर अनाथश्रमात पाठवलं, गोव्यात केस होती माझी. त्या inspector ला तेव्हा १० लाख दिले होते, केस close करायला. तरी तो तयार होत नव्हता. आणखी १० लाख देऊन त्याचं तोंड बंद केलं, कोमलला बरोबर घेतलं. आणि मुंबईला आले, त्यानंतर पुन्हा गोव्याला कधी गेले नाही.",
" आणि मी ती केस re-open केली. तो inspector तर आता रिटायर झाला. पुन्हा सगळी माहिती गोळा केली आणि arrest warrant आणलं. तुमची केस संपली मिसेस सावंत. " त्या उठून बाजूला गेल्या. 
" मिसेस सावंत… जाता जाता एक नावं काढा अजून." त्यांनी एक पेपर उचलला. " मिस्टर सावंत… ? " त्यांनी आश्चर्याने बघितलं. 
" छान… चला तुमचा नंबर आहे. या बसा… ",
" काय…. मी कोणता गुन्हा केला… माझं नावं का ? ". 

" या बसा … सांगतो तुम्हाला." मिस्टर सावंत बसले.
" Thanks to महेश, मला हे कळलं ते महेशमुळे. त्याने आपला मोर्च्या आता मिस्टर सावंतकडे वळवला. 
" तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये खूप बिझी असता ना… नुकसान होऊ नये म्हणून… ", त्यांनी 'हो' म्हटलं.
" तर कोमल आता बंगलोर ऑफिसला जात नाही.मग तुम्ही का गेला नाहीत इतके दिवस, त्या ऑफिसला… आहे का उत्तर… ",
"प्लीज inspector… प्लीज. " मिस्टर सावंत विनवण्या करू लागले. 
अभिने नकारार्थी मान हलवली." २ वर्षापासून केस चालू आहे ना… smuggling ची…. बंगलोरमध्ये… बरोबर ना… ",
"हो… "
"त्यात अजून एक केस होती… मी सांगू कि तुम्ही सांगता…. " त्यांचा चेहरा बघण्यासारखा झाला होता. 
" सांगा सावंत…. का खून केलात तुम्ही… तुमच्या manager चा…. का मारलं त्याला…",
"पप्पा !!! काय ऐकते आहे मी…" काजल बोलली. 
" हो… मी खून केला त्याचा…. कारण त्याच्याकडे खूप पुरावे होते माझ्या विरोधात…. तो मला black mail करत होता. आधीच त्याने माझ्याकडून २५ लाख घेतले होते.",
"म्हणून त्याचा खून केलात तुम्ही… आणि हि मर्डर केस दडपण्यासाठी त्या जजला पुन्हा २५ लाख दिलेत… किती बेशरेमीची गोष्ट आहे. पैशासाठी न्याय विकला जातो. लाज वाटते मला, आपण या न्याय व्यवस्थेचा भाग आहोत त्याचा." अभि उठून येरझाऱ्या घालू लागला. 
" मिस्टर सावंत…. त्या जजला तर मी अटक केली आहे. तुम्हाला… smuggling आणि मर्डर, अश्या दोन्हीसाठी अटक करावी लागेल मला." मिस्टर सावंत बाजूला जाऊ लागले. 
" तुम्हीही एक नाव काढा आता…" त्यांनी नावं वाचलं… "राहुल… ". राहुलकडे सगळे पाहू लागले. राहुलचा चेहरा बघण्यासारखा झाला होता. 
" माझं नावं कसं… ? " राहुल पुढे येऊन म्हणाला. 

          अभिने स्वतः त्याला जबरदस्ती बसवलं खुर्चीवर. " तुझी सगळी history मी सांगतो.… राहुल…. हुशार मुलगा, स्वतः काहीतरी करून दाखवायचे होतं म्हणून बिझनेस सुरु केला, तो पैसे उसने घेऊन. त्यात नफा मिळाला पण साहेबांची स्वप्न मोठी… झटपट होण्यासाठी याने smuggling सुरु केलं. तेही मोठया व्यक्ती बरोबर… मिस्टर सावंत बरोबर… एका वर्षात खूप पैसे कमावले दोघांनी. पण जास्त काळ ते सुख अनुभवता आलं नाही. सावंत वर केस लागली त्या manager मुळे… याच्यावर सुद्धा केस होती. परंतु तेच लाच देणे… त्यामुळे राहुल सुटला. सावंत already मर्डर केससाठी पैसे देऊन बसले होते. ते अडकले यात. राहुल मोकळा… काय बरोबर ना राहुल… ".
"अगदी बरोबर inspector… मग आता का पकडलं आहे मला… तुमच्याकडे त्याबाबत कोणता पुरावा नाही आहे… मी निर्दोष आहे. " राहुल खुशीत बोलला. आणि उभा राहिला. 
" बस रे… अजून संपलं नाही माझं… पुन्हा राहुलने बिझनेस सुरु केला. तो एकटा तर सुरु करू शकत नाही , म्हणून वेगळा पार्टनर निवडला. I mean…. पार्टनर निवडली…. कोमल सावंत…. पुन्हा तेच डोक्यात smuggling …. यावेळी सगळं सुरक्षित वातावरणात…. कोकेनची smuggling…. " यावर राहुल गप्प झाला. " आम्ही खोलवर चौकशी केली… कोकेन सापडली आम्हाला… कोमल आणि राहुलच्या घरी तपास केला तिथे सापडली कोकेन… व्वा !!! राहुल सर …. खूप मोठ्ठ काम केलंत तुम्ही…. जा, बाजूला जाऊन उभा रहा. " अभि आता त्या टेबलाजवळ येऊन उभा राहिला. एकच arrest warrant राहिलं होतं आता, " चला… हे नावं मीच वाचतो आता… " अभिने नाव पाहिलं… " Mr. पंडित… " आता तर वेगळंच काहीतरी… 

" काहीतरी चुकते आहे तुमचे…. ",
"नाही सर… या बसा hot seat वर." अभिने त्यांच्या खांद्यावर हात टाकला आणि खुर्चीवर आणून बसवलं.
" पण मी कोणताच गुन्हा केला नाही… " मिस्टर पंडित म्हणाले. 
" ते मी सांगतो… तुम्ही tension घेऊ नका… " अभिने काही कागदपत्र काढली. 
" मी जेव्हा मिस्टर सावंतची केस study करत होतो तेव्हा असं कळलं कि राहुलने कोणाकडून तरी पैसे घेतले होते. आणि त्या बिझनेसमध्ये सुद्धा २५% ची भागीदारी होती. केसमध्ये सावंत पूर्ण अडकले होते. दुसरा पार्टनर राहुल , सुटला होता. त्यामुळे राहुलला पैसे देणारा कधी पुढे आलाच नाही. आता कळल सगळ्यांना , कोणी पैसे पुरवले ते." अभिने पंडित याच्या खांद्यावर हात ठेवला. ते घाबरेघुबरे झाले. " एका केसमधून अगदी सही सलामत बाहेर आल्यावर यांची हिंमत अजून वाढली. जेव्हा राहुलने नवीन smuggling सुरु केली तेव्हा सुद्धा यांनीच पैसे पुरवले, पण ५० % भागीदारीवर. तेही नाव पुढे न आणता… आता हि सगळी माहिती मला राहुलच्या ऑफिसमधून कळली…. तर सांगायचा मुद्द्दा असा कि तेव्हा सुटलात तुम्ही… आता केस माझ्याकडे आहेत… आता बघतो मी एकेकाला… " म्हणत तो स्वतः खुर्चीवर बसला. 

            शांतता… चार जणाविरुद्ध arrest warrant होतं. ते सगळे मान खाली घालून उभे होते. अभि सगळ्याकडे पाहत होता. काजल रडत होती. महेश अजूनही अभिकडे पाहत होता. " कसं ना…. सगळेच गुंतले आहेत crime मध्ये…. एखाद्या movie सारखं झालं… मी आता हल्लीच एक movie बघितला होता मी. त्यातसुद्धा असंच दाखवलं होतं, सर्व लोकांना एकत्र बोलावून सगळ्यासमोर आरोपीला आणायचे. मला असंच करायचे होते एकदा. तरी एवढया लवकर संधी येईल अस वाटलं नव्हतं मला.… मस्त एकदम. " अभि स्वतःच हसत होता. बराच वेळ महेश, अभिकडे पाहत होता. त्याने न राहवून अभिला विचारलं,
" अरे पण, आपली main केस राहिली ना… कोमल कूठे आहे… ",
"हो रे… ते विसरलो मी…. सांगतो. चल सगळ्यांनी बसून घ्या. आता एक नवीन movie सुरु होते आहे. " वातावरण गंभीर होतं. त्यात अभि काय काय बोलत होता. " ok…. sorry, जरा गंभीर होतो मी पण." आता सगळ्याचे लक्ष अभि काय बोलतो त्यावर होतं.

" कोमल कूठे असेल… तुम्हाला काय वाटते मिस काजल… " सगळे काजलकडे पाहू लागले. तशी काजल जरा दचकली. 
" म… मला कसं ठाऊक ते… ",
"Its ok… मिस काजल… relax… असंच विचारलं मी." अभि बोलत बोलत काजल जवळ आला. 
" मिसेस सावंत… तुम्ही म्हणता ना, कि काजलला गाडी चालवता येत नाही.",
"हो… म्हणून तिचा पास आहे ट्रेनचा. मुंबई ते गोवा… ", अभि पुन्हा काजलकडे आला,
" तुमचा driver आहे ना मिस काजल… गोव्याला… ",
"हो….",
" त्याला तर तुम्ही ३ महिन्यापूर्वी काढून टाकलं ना…. मग driving कोण करते… " काजल गप्प. थोड्यावेळाने बोलली ती,
" गाडी नाही use करत… अशीच जाते ऑफिसला " अभि स्वतः शीच हसला.

" गोव्याला flight ने का जात नाही तुम्ही…. ?",
"असंच… भीती वाटते मला म्हणून… ",
"ट्रेनचा पास बघू शकतो का मी… " काजलने पास दाखवला. 
"तीन मेल आहेत ना … मुंबई ते गोवा… तिन्ही ट्रेननी जाऊ शकता का… ",
"हो… पण मी दोनच use करते… तिसऱ्या ट्रेनने जास्त वेळ लागतो.",
"साधारण किती वेळ लागतो … मुबई ते गोवा…",
"१०.३० ते ११ तास लागतात.",
"बरोबर … आणि गोवा ते मुंबई…. त्याला किती वेळ लागतो.?",
"तेवढाच वेळ लागणार ना… inspector " अभि काजलच्या समोर येऊन बसला. 
" गोव्याला तुमच्या flat आहे, तिथे तसेच अजून ८ flats आहेत ना… तिथे प्रत्येक व्यक्तीचा in-out time नोंदवला जातो… बरोबर ना. ", आता काजल चुळबुळ करू लागली. " गेल्या ३ आठवडयात तुम्ही… एकूण ८ वेळा गोव्याला गेलात.… मुंबई ते गोवा…. तो time बरोबर match होतो… परंतु गोवा ते मुंबई… तो वेळ जरा गडबड आहे. " ,
"काय म्हणायचे आहे तुम्हाला inspector…. " मिस्टर सावंत. 
" ८ वेळा त्या ९ तासाच्या आत मुंबईत आल्या आहेत. even, तुमच्या मुंबईच्या सोसायटी मध्ये सुद्धा In-out time नोंदवला जातो…. गेल्यावेळी म्हणजेच ५ दिवसांपूर्वी तुम्ही गोव्यावरून सकाळी ७ वाजता निघालात. आणि मुंबईला ३ वाजता हजर होता. जर मेल कमीत कमी १०.३० तासात मुंबईला पोहोचते, तर तुम्ही ८ तासात कश्या आलात मुंबईला… " काजल घाबरली आता.
" बर… ते सगळं असू दे… तुम्हाला मी शेवटी जेव्हा भेटायला बोलावलं होतं, तेव्हा तुम्ही एक वाक्य बोलला होतात… आठवतंय काही…",
"कोणतं… ",
"तुम्ही म्हणाला होतात कि ट्रेनमध्ये तिच्या सामानावर नजर ठेवून कोणीतरी केलं असेल… ",
"हो … मी बोलले होते असं… ",
"छान… कोमल ट्रेनने बंगलोरला निघाली होती ते कोणी सांगितलं तुम्हाला… कोमलने शेवटचा call केला तेव्हा ती मुंबईत होती, म्हणजेच ८ वाजता केला होता… तोही तुम्हाला नाही. त्यावेळेस तुम्ही गोव्याला होता. शिवाय ही माहिती फक्त आमच्याकडे होती… आम्हीही तुम्हाला कोणाला सांगितलं नाही त्याबद्दल… तर प्रश्न असा आहे, कि तुम्हाला कसं माहित कि कोमल ट्रेनने प्रवास करत होती." काजल चलबिचल झाली. 
" मला जरा बरं वाटतं नाही… मी जाऊ शकते का ? "काजल डोक्याला हात लावत बोलली. 

" नाही… थांबा जरा, जाऊ सगळेच आरामात… " अभिने हाताने खुण करून ladies constable ला काजलजवळ बोलावलं. काजल उगाचच इकडे तिकडे पाहत होती. " मुद्यावर येऊ आता… कोमलला का kidnap केलंत तुम्ही… मिस काजल. " आता सगळेच…. तिथे जमलेले पोलिस, हवालदार, ladies constable, महेश …. सगळेच…. अभि आणि काजलकडे बघू लागले. 
" काय बोलत आहात तुम्ही… मी… मी का करीन तसं… " काजल मोठयाने बोलली. 
" ते तुम्हीच सांगा… " ,
"मला बर वाटत नाही… मी चालले. " काजल उठून जाऊ लागली. तसं मागे उभ्या असलेल्या ladies constable ने तिला जबरदस्ती खाली बसवलं. अभिने एका हवालदाराला बोलावलं. त्याला काही सांगितलं. तसा तो बाहेर गेला आणि गाडीतून दिपेशला घेऊन आला. त्याला पाहून काजल अजूनच घाबरली. 

" आता बोला मिस काजल, दिपेशने आधीच सगळं सांगितलं आहे. त्यामुळे आता खरं सांगावं लागेल तुम्हाला." काजल गप्पच… अभि काजलकडे पाहत होता . महेश पुढे आला. 
" अभि… काजल कशाला kidnap करेल तिला… दिपेश तसं बोलला का तुला… " अभिने नाही म्हटलं. 
" तुला कसं कळलं पण… काजलच आहे ते." ,
" सांगतो… " अभिने पुन्हा एकदा काजलकडे कटाक्ष टाकला. 
" पहिल्यादा आपण जेव्हा यांच्याकडे आलो होतो, तेव्हा काजल नुकतीच गोव्यावरून आली होती. तिने सांगितलं ट्रेनने आली. पण माझं लक्ष तिच्या सामनावर गेलं. तिच्या bag वर ते विमानतळावर check in आणि check out करताना, जी तपासणी होते, तेव्हाचे tag's तसेच होते. मला तेव्हाच संशय आला होता कि काजल खोटं बोलत आहे. त्यानंतर गोवा ते मुंबई time… ते तर फक्त Flight ने शक्य आहे. शिवाय गोव्याच्या flat वर काही तिकिटे मिळाली मला. त्यावरून हे सिद्ध होते कि काजल विमानाने travel करते. तिला driving येते हे सुद्धा गोव्याला कळलं. तिथल्या security guard ने सांगितलं. पुण्यात सापडलेली गाडी ही सोलापूरची होती. तिथून ती भाड्याने घेतली होती, काजलच्या नावाने… हिचा फोटो ओळखला त्या कार मालकाने, जिथून गाडी भाड्याने घेतली होती. याचा अर्थ, काजलला driving पण येते." अभि काजलकडे पाहू लागला. ती शांतपणे सगळं ऐकत होती. अभि उभा राहिला आणि चालत चालत मिसेस पंडित ( अमितची आई ) यांच्याकडे आला. " ती काही बोलत नाही… तर तुम्ही तरी सांगा… " राहुल "आ"वासून पाहत होता. 
" काय ? ", मिसेस पंडित. 
" हो… काजलच्या नोकराने सांगितलं आम्हाला… पहिला अमित असायचा तिथे… त्यानंतर दिपेश, मिसेस पंडित… या दोन व्यक्ती सुद्धा गोव्याला जायचे काजलला भेटायला. का ते आता काजल सांगेल." पुन्हा अभि काजलकडे आला. " बोला… मिस काजल, बोला… " अभि ओरडला , तशी काजल मोठयाने दचकली. 

"हो…हो, मीच kidnap केलं तिला… भेटलं उत्तर तुम्हाला. " काजल रडत रडत म्हणाली. सगळेच वेडे झाले ते ऐकून. मिस्टर सावंत तर धावत काजलकडे आले. 
" बेटा… खर सांग… तू केलंस हे… " काजलने हो म्हटलं,तशी एक जोरदार थोबाडीत बसली तिच्या. 
" का… का केलंस असं … तुझी बहिण होती ना ती. का केलंस असं… ? " दोन हवालदार पुढे आले आणि सावंतांना पकडून बाजूला नेलं. अभि हे सगळं शांतपणे पाहत होता. 
" सांगा मिस काजल, का kidnap केलंत तिला ? ",
"अमितच्या खुनाचा सूड घेण्यासाठी… ",
"काय… ? " यावेळी अभिला shock लागला. " काय बोलताय तुम्ही… कोमलने अमितचा खून केला आहे.… ?" ,
"हो… ",
"हे तुम्हाला कसं माहित… " काजलने डोळे पुसले. 
" कोमल आणि राहूलने नवीन बिझनेस सुरु केला होता. आमचा बिझनेस सांभाळून नवीन बिझनेस…. पण तो बिझनेस नसून smuggling आहे, हे मला फार उशिरा कळलं… आणि मलाच उशिरा कळलं ते… माझ्या या आईला , सख्या आईला ते आधीपासून माहित होतं. पण पैश्यासमोर नाती काय चीज आहेत… " अभिने मिसेस सावंतकडे पाहिलं. " अमितला हि गोष्ट कळली होती, म्हणूनच तो कोमलला ती letters पाठवायचा. राहूलला कळल कि अमित black- mail करतो आहे आणि पोलिसांना सगळं सांगणार होता. म्हणून कोमल, राहूल आणि माझी आई… या तिघांनी अमितला मारायचा प्लान केला. आई जेव्हा अमितला भेटायला सोलापूरला गेली होती, तेव्हाच राहूलने अमितला भेटायला बोलावलं. त्या मिटिंगमध्ये भांडणे झाली. कोमलचा आधीच राग होता अमितवर. त्यात हे सगळं. अमित मिटिंग मधून निघाला आणि कोमलने त्याला गोळी मारली." सांगता सांगता काजलला रडू आलं. तिथे अमितच्या आईच्या डोळ्यात पाणी आलं. " सगळ्या गोष्टी झटपट झाल्या. राहूलने ती गन लपवली, कोमल बंगलोरला गेली आणि आईने अमितची dead body पुण्यात, स्वतः drive करत आणून जंगलात टाकून दिली. त्या चोरांनी, त्याच्या अंगावरचे कपडे, अंगठया, चैन… काढून घेतलं. प्रेत उघड्यावर आणलं. त्यामुळेच ते पोलिसांना भेटलं."

सगळेच स्तब्ध झालेले ते ऐकून.… अरे बापरे !!! काय विचार केलेला आणि काय समोर आलं…. great… अभि मनातल्या मनात बोलला. महेशच डोकं चक्रावलं. तरीसुद्धा त्याला kidnap कसं केलं ते जाणून घ्यायचं होतं. " काजल तुला हे सगळं कस समजलं आणि kidnap … ते कसं केलंस… "काजल सांगायला लागली. 
" कोमलची एक गोष्ट आहे, माझ्या बरोबर सगळं share करते ती, अमितच्या खून कसा केला, कसं त्याला फसवून आणलं… सगळं सांगितलं मला तिने. खूप रडले होते तेव्हा. कोमल एवढी क्रूर कर्म करू शकते…. पण याचा सूड घ्यायचा हे मनात पक्क केलं. माझं नशीब चांगलं होतं. कारण त्याचं रात्री घरी येताना मला दिपेश भेटला. त्याला पैसे देऊन माझ्या बाजूने केलं. अमितच्या बाबतीत काय झालं ते मी त्याच्या आईला आधीच सांगितलं होतं. त्यांनाही खूप वाईट वाटलं, पण मला साथ द्यायचे कबूल केले. माझा प्लान तयार होता फक्त संधीची वाट पाहत होते. नशीब खूष होतं माझ्यावर. संधी चालून आली. दिपेश कोमलवर नजर ठेवून होता. त्यानेच मला call करून सांगितलं कि ती ट्रेनने निघाली आहे बंगलोरला. तेव्हाचं तिला kidnap करायचं ठरलं.त्यादिवशी योगायोगाने अमितच्या आई सोलापूरला होत्या. कोमलला सोलापूरला अडवायचं , हे त्यांनीच पक्क केलं. मी तेव्हा गोव्यावरून निघत होती. दिपेश त्याचं ट्रेनमध्ये होता. त्यानेच वेळ साधून तिची bag पळवली. कोमल सोलापूरला उतरली ती तक्रार नोंदवायला. दिपेशने call करून अमितच्या आईला ती स्टेशनवर आहे हे सांगितलं." अभिने हाताने "थांब" अशी खुण केली काजलला. 
" तुम्ही सांगा मिसेस पंडित… ",त्यांनी सांगायला सुरु केलं. 
"कोमलची ट्रेनसुद्धा सुटली होती तेव्हा. तिला मी स्टेशनवर बघितलं. आणि उगाचच तिच्या समोरून गेली. कोमलनेच हाक मारली मला. मग बोलता बोलता तिला मी हॉटेलमध्ये घेऊन गेले. खाण्यात गुंगीचे औषध मिसळले. तोपर्यत काजल आली होती गोव्यावरून सोलापूरला. कोमल बेशुद्ध झाली होती. तिला मी काजलकडे सोपवलं." 

"हम्म… पुढे मिस काजल… " अभिने काजलला सांगितलं. 
" कोमलला मी तसंच पुण्याला घेऊन जायचे ठरवलं होतं. पण विमानाने जाऊ शकत नव्हती. कारण उगाच चौकशी झाली असती विमानतळावर. मग सोलापूरला गाडी rent वर घेतली. गाडीने पुण्याला आली, आमची एक रूम आहे तिथे, तिथे कोमलला ठेवलं. तशीच सोलापूरला जाणार होते, तोपर्यंत गाडी 'no parking' मध्ये ठेवल्याने जप्त झाली होती. मग पुण्यालाच थांबले. दिपेशने कोमलच सामान गोव्याला flat वर जाऊन ठेवलं आणि अमितच्या आई मुंबईला आल्या.पप्पांचा call आला, तशी मी flight ने मुंबईला आली." काजलच बोलणं संपलं. अभिने सुरु केलं. 
" दिपेश सामान घेऊन गोव्याला गेला तेव्हा कोमलचा मोबाईल सुद्धा त्या सामानात होता. म्हणूनच कोमल गोव्याला गेली नव्हती, तिचा मोबाईल गोव्याला होता… आठवलं महेश… तिसरी लोकेशन. " महेशने मान हलवली. 
" By the way, कोमल इतके दिवस बाहेर कशी आली नाही मग… ",
"yes… मला वाटलेच होते कि तू विचारणार ते." अभि हसत म्हणाला. " तुला बोललो होतो ना, या सगळ्यांवर पाळत ठेवली पाहिजे.… आणि जेव्हा काजलच्या गोवा ते मुंबई या वेळेत गडबड वाटली तेव्हा दोघांना तिच्या मागावर ठेवलं. काजल गोव्यावरून पुण्याला यायची, कोमलची तब्येत बघायची, थोडावेळ थांबून मुंबईला यायची. ती रूमसुद्धा भेटली आम्हाला. कोमल लगेच सापडली. पण मुद्धाम मी काजलला अटक नाही केली, सगळी स्टोरी मला ऐकायची होती. " अभि, महेशजवळ आला. " आणि madam नी कसं ठेवलं होतं तिच्या बहिणीला माहित आहे… कोकेनच्या अमलाखाली… नशेमध्ये. शिवाय देखरेख करायला २ बायका पण होत्या. त्यांना काजलने बरोबर सांगून ठेवलं होतं, कोकेनचे injection किती वाजता देयाचे ते.… just a perfect plan……. ना. ",
"मग आता… ",
"आता कोमलला आम्ही हॉस्पिटलमध्ये ठेवलं आहे. काही दिवसात होईल ठीक ती. " 

                सगळ्यांच्या चेहऱ्यावर वेगवेगळे भाव होते. कोणीच काही बोलत नव्हतं. काजल शांत होती. अभि,महेश सगळ्यांकडे पाहत होते.… शांतता.… 
"एक प्रश्न विचारू… अमितचा खून कोमलने स्वतःला वाचवायला केला, मिसेस सावंतानी, कोमल अडकू नये म्हणून तिला मदत केली. तर तू कोमलला kidnap का केलंस ?. " काजल शांतपणे ऐकत होती. खूप वेळाने तिने चेहरा पुसला. डोळे पुसले. 
" कारण…. कारण अमितवर माझं प्रेम होतं. " पुन्हा कहानी में twist.… अभिषेक, महेश एकमेकांकडे पाहू लागले. 
" हो… माझं प्रेम होतं अमितवर… तो शाळेत असल्यापासून… फक्त त्याला कधी सांगू शकले नाही. मनापासून प्रेम केलं त्यांच्यावर. पण अमितचं कोमलवर प्रेम होतं. कोमलचं प्रकरण त्याने मलाच सांगितलं होतं पहिलं… कोमलने खूप मोठी चूक केली त्याचा खून करून…. खूप रडले होते मी." काजल मख्ख चेहऱ्याने सांगत होती. 
" कोमल माझी सख्खी बहिण नव्हती, हे मला माहित होतं. तिला त्याची कल्पना नव्हती. ती माझ्यापेक्षा मोठी होती, असं आईने सांगितलं होतं. पण ती प्रत्येक गोष्टीत माझ्या पुढेच असायची, प्रत्येक गोष्टीत मधे मधे करायची. त्याचा विशेष राग यायचा मला. मी कोणाशी बोलायचं , कूठे जायचे हे ती ठरवायची. अरे !!!… माझी life मला जगूच द्यायची नाही. अमित तिला आवडायचा नाही, मला सांगायची, बोलू नकोस त्याच्याशी. त्यात अमितला, कोमलने थोबाडीत मारली होती… त्याचा राग होता मनात माझ्या. पप्पा, आई… तिचीच प्रशंसा करायचे, तिचेच लाड करायचे. त्यामुळे तिच्याबद्दल राग वाढत गेला मनात.… आणि अमितला मारलं तिने. मग मी स्वतःला नाही थांबवू शकले.…. सूड घ्यायचा या सगळ्याचा.… ठरवलं…. मीही काही करू शकते हे तिला दाखवायचं होतं… बाकीच्या गोष्टीसाठी तिला माफ केलं असतं, पण… अमित… माझ्या प्रेमाच्या आड आली ती… प्रेम होतं त्याच्यावर…. त्यासाठी माफी नाही." 

           सगळेच मुकाटपणे ऐकत होते. काय बोलणार आता… अभि गप्प होता. महेश शांत होता. आता सगळचं कळलं होतं. थांबून राहण्यात काही अर्थ नव्हता. अभिने सगळ्यांवर नजर फिरवली. " माझ्याकडे actually काजलच्या विरोधात कोणताच पुरावा नव्हता. त्यामुळे तिने स्वतःच कबूल करणं गरजेचे होते.… मिस काजल, मी तुम्हाला kidnap आणि कोकेनचा एका व्यक्तीवर वापर करण्यासाठी अटक करतो." काजलच्या चेहऱ्यावर कोणतेच भाव नव्हते. " घेऊन जा रे सगळ्यांना." एकेकाला गाडीत घेऊन जाऊ लागले. सगळ्यात शेवटी काजलला घेऊन जाऊ लागले. अभि कधीपासून तिच्याकडे पाहत होता.… ती गाडीत बसणार,तितक्यात अभिने तिला थांबवलं. 
" एक शेवटचा प्रश्न… कोमलवर एवढा राग होता तुमचा…. आधीपासूनच… त्यात अमितचा खून केला तिने… मग कोमलला तू सुद्धा मारू शकत होतीस ना… तसं न करता तिला पुण्यात डांबून ठेवलंस.… नशेमध्ये… मारलस का नाही… ? ". काजलने शांत नजरेने अभिकडे पाहिलं. 
" लहानपणापासून एकत्र होतो आम्ही. राहूल पेक्षाही माझ्यावर जास्त प्रेम होतं तिचं…. रक्ताचं नातं नसलं तरी…. शेवटी बहिण आहे माझी ती. " काजलने स्मित हास्य केलं आणि स्वतः गाडीत जाऊन बसली. 

           सगळ्या पोलिसांच्या गाड्या रवाना झाल्या. अभि आणि महेश, त्या बंगल्याबाहेर बसले होते. " congrats… अभिषेक… अजून एक केस solve केलीस. आता पुढे काय ?" महेश बोलला.
" आता… आता काय केसेस सुरु होतील कोर्टमध्ये. त्यात गुंतावे लागेल. दिपेशचा actually काही गुन्हा नाही. त्याने फक्त मदत केली. तो सुटू शकतो. बाकीच्या लोकांना, तर शिक्षा होईलच. कोमल पूर्ण ठीक झाल्यावर तिच्यावर गुन्हा दाखल होईल.… पण… ",
"पण काय अभि ? ",
"बघ ना… सगळे कसे एकमेकांत गुंतलेले होते, Mr. पंडित ज्या smuggling मध्ये ५० % चे पार्टनर होते, त्यासाठीच त्यांच्या मुलाचा खून झाला. कोमलने Mr. सावंतच्या पुढे काम केलं… शांत वाटणाऱ्या काजलने एवढं मोठं पाऊल उचललं. … मोठी माणसं आहेत, पैसेवाली… पैसे देऊन bail वर सुटतील. पण त्यांच्या नात्यावर ज्या जखमा झाल्या आहेत, त्या पैसे भरून सुद्धा भरणार नाहीत.… तश्याच राहतील, जन्मभर. " महेशने अभिच्या खांदयावर हात ठेवला. 
" चल निघूया. " महेश म्हणाला. "हो… या केसमध्ये खूप ठिकाणी पळायला लागलं नुसतं. आता मस्त घरी जातो. आणि आरामात एखादा movie बघत बसतो." अभि म्हणाला. " पुन्हा पोलिसांचा movie…. " महेश हसत म्हणाला. त्यावर अभि दिलखुलास हसला. हसत हसत, गप्पा मारत, चालतच ते दोघे निघाले.    


------------------------------------------  The End  ----------------------------------------                       


Followers